शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोहता मिलची चाके थांबली साडेसहाशे कामगार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करुन मिलचे कामकाज बंद केले आहे.

ठळक मुद्देविद्युत व पाणीपुरवठा खंडीत । कामगारांनी पालकमंत्र्यांकडे मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या मोहता मिलच्या कामगारांना मागील काही दिवसांपासून व्यवस्थापनाकडून सहकार्य केले जात नव्हते.वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करुन मिलचे कामकाज बंद केले आहे. त्यामुळे आयुष्याच्या उमेदीचा काळ मिलमध्ये घालविणाऱ्या साडेसहाशे कर्मचाऱ्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.हिंगणघाट येथील मोहता ग्रुपने १२५ वर्षाच्या कार्यकाळात या मिलमध्ये व्हिविंग अ‍ॅण्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू आहे. मेलमध्ये ३ शिफ्ट कामगार काम करतात. या मिलमध्ये १२०० ते १३०० कामगार २०१५ पर्यंत काम करीत होते. तसेच ठेकेदारी मध्ये जवळपास २०० कामगार काम करीत होते. या कामगारांच्या भरोशावर मोठी प्रगती साधली. या ग्रुपने हिगणघाट व वणी येथे गिमाटेक्स, जांब येथे पी.व्ही.टेक्सटाईल व बुरकोनी येथे आर.एस.आर.मोहता मिल्स, अशा मोठ्या कंपन्या उभारल्या. या सर्व कंपन्या अद्यावत असून चांगल्या प्रकारे सुरुही आहे. मात्र, मोहता मिलमध्ये वीस वर्षांपासून काम करणाºया कामगारांना व्यवस्थापनाने कायम केले नाही. ०१ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाता बंद केला. त्यामुळे कामगारांसमोरील अडचणींचा फास आवळल्या गेला. मागील सहा महिन्यांपासून प्रोसस व फोल्डींग विभागातील कामगारांना जाणीवपूर्वक काम देणे बंद केले. तसेच अन्य खात्यात सुद्धा काप्लीमेंटनुसार कामही दिले नाही. तसेच दोन महिन्यांपासून कामगारांचे वेतन सुद्धा वेळेवर दिले नाही. कामगारांना ले-ऑफ देण्यात येते परंतु कामगारांना ले-आॅफचा पगार देण्यात येत नाही. तसेच बदली कामगारांना रिटर्न देण्यात येते मात्र ते रिटर्नचा मोबदला देत नाही, अशा अनेक समस्या या व्यवस्थापनाने कामगारांपुढे उभ्या करुन त्यांचे खच्चिकरण सुरु केले. याच्या विरोधात कामगारांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून मागण्या शासन दरबारी मांडल्या परंतु त्यांना यश आले नाही. अखेर शनिवारी जल व वायु प्रदुषणाच्या नावाने मिलचा विद्युत व पाणीपुरवठा खंडीत केला. याची माहिती पहिल्या पाळीतील कामगारांना मिळाल्यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे मिलमधील साडेसहाशे कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.कामगारांची जनसंवाद कार्यक्रमात धडकपहिल्या पाळीतील कामगार नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी मिलमध्ये गेले असता मिलच्या मुख्यव्दाराच्या बाजुला असलेल्या सूचना फलकावर मिलव्दारे जल व वायुप्रदुषण वाढत असल्याने या मिलचा विद्युत आणि पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिली लावलेली होती. यावरुन या मिल व्यवस्थापनाने कामबंद केल्याचे कामगारांच्या लक्षात येताच सर्व कामगार एकत्र आले. दरम्यान, वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम असल्याची माहिती मिळाल्याने सर्व कामगारांनी जनसंवाद कार्यक्रमात धडक दिली. यावेळी मिल व्यवस्थापकाकडून कामगारांच्या होणाऱ्या शोषणाबाबत माहिती देऊन कामगारांच्या संमस्या सोडविण्याची मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.