शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गहू भुईसपाट; संत्रा व केळीचे नुकसान

By admin | Updated: February 28, 2016 02:09 IST

जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू असतानाच शनिवारी सायंकाळीही पुन्हा काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

वादळी पावसाचा फटका : वर्धेसह, सेलू व कारंजा तालुक्यात गारपीटवर्धा : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू असतानाच शनिवारी सायंकाळीही पुन्हा काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वर्धेसह सेलू व कारंजा (घाडगे) तालुक्यातील काही भागात तुरळक गारा पडल्या. शनिवारी सायंकाळीही जिल्ह्यावर पावसाचे सावट कायम असल्याचे चित्र होते.या पावसासह झालेली गारपीट व वादळामुळे शेतात सवंगणीला आलेला गहू भुईसपाट झाला तर शेतात ठेवलेल्या चन्याच्या गंज्या ओल्या झाल्या. शनिवारी सायंकाळी आलेल्या गारपीटीमुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. यावेळी आलेल्या गारांमुळे केळीचे घड कोसळले. काही घरांवर छत उडाले. कारंजात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागांचे नुकसान झाले. आकोली, आंजी भागातही गारपीट झाले. शुक्रवारी दिवसभर तापलेल्या उन्हानंतर रात्री अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची सकाळी पाहणी करण्यात आली असता बऱ्याच शेतात गव्हाचे उभे पीक भुईसपाट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारच्या पावसाने सर्वाधिक नुकसान वर्धा तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले. या पावसामुळे वायगाव (निपाणी) परिसरात गहू व कापूसही ओला झाला. आंजीतही गहू चन्याचे नुकसान झाले. खरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे पीक हातचे गेले. यामुळे रबीत उत्पादन घेवून झालेले नुकसान भरण्याची शेतकऱ्यांची इच्छा असताना या वादळी पावसामुळे दृष्टचक्र सुरूच असल्याचे दिसले. यामुळे नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.