शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

Wardha | व्हॉट्सॲपवर करा तक्रार, जिल्हाधिकारी करणार निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 15:37 IST

वर्धेत नवीन उपक्रम : जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षाची स्थापना

वर्धा : नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा पुरविण्यासाठी तसेच शासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘व्हॉट्सॲप ग्रिव्हन्स रेड्रेसल’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत व्हॉट्सॲप तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात न येता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार करता येणार असून, तक्रारीचे जिल्हाधिकारी निवारणही करणार आहेत.

या कक्षामध्ये सुरू करण्यात आलेल्या ९१५६७०६१०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत नागरिकांना काही तक्रार असल्यास दाखल करता येणार आहे. ज्या नागरिकांनी पूर्वीच त्यांचे व्यक्तिगत किंवा शासकीय कामासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला आहे. परंतु विहित मुदत उलटूनही त्या अर्जावर कार्यवाहीसंदर्भात माहिती अप्राप्त आहे, अशा अर्जदारांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांशी संबंधित योजना, जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, आदिवासी विभागाच्या बिरसा मुंडा कृषी योजना, जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधीत शेतकरी शिवार पांदण रस्ता, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विभागाच्या सर्व योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बियाणे, खते, औषधांसंबंधीत तक्रारी, फळबाग लागवड, नाला खोलीकरणाची कामे आदी योजनांबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे.

तक्रार करताना काय करावे?

नागरिकांनी अर्ज सादर करतांना त्यांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक लिहून ज्या कार्यालयाकडे पूर्वी अर्ज केला आहे, त्या कार्यालयाचे नाव, पत्ता, अर्जाचा दिनांक आदी तपशील वाचनीय स्वरूपात नमूद करून अर्जाचा फोटो व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करावा. त्यानंतर नागरिकांना त्यांच्या व्हॉट्सॲपवरील संदेशाच्या तीन दिवसांच्या आत त्यांच्या यापूर्वीच्या अर्जाची सद्यस्थिती तसेच केलेल्या व करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती पुरविली जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली.

नागरिकांच्या तक्रारीचा वेळीच निपटारा होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून ‘व्हॉट्सॲप ग्रिव्हन्स रेड्रेसल’ योजना राबविली जात आहे. या माध्यमातून व्हॉट्सॲप तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. यामुळे वेळ आणि त्रासही वाचणार असल्याने नागरिकांनी याचा फायदा घ्यावा.

राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धाcollectorजिल्हाधिकारी