शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

अहो आश्चर्यम्! पक्क्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

शहरातील बऱ्याच भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ते खडबडीत झाले आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे. अशातच रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मालगुजारीपुरा येथील जयस्वाल ते धाबलिया यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. वास्तविक, हा रस्ता आधीच सिमेंटचा असून मजबूत आहे.

ठळक मुद्देलाखोंच्या निधीचा चुराडा : नगरपालिकेच्या विकासकामांवर पिकला हशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे अगोदरच वर्धेकर वैतागले आहेत. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाने मजबूत सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करून पालिकेच्या निधीचा चुराडा केला. तर आता सिमेंटच्या पक्क्या रस्त्यावर पुन्हा नव्याने सिमेंटचा रस्ता बांधून लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय चालविल्याचा आरोप खुद्द प्रभागातील नागरिकांकडून केला जात आहे. मागणी आणि आवश्यकता नसतानाही विकासाच्या नावावर चालविलेल्या निधीच्या या उधळपट्टीमुळे पालिकेच्या कामांचाही हशा होत आहे.शहरातील बऱ्याच भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ते खडबडीत झाले आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे. अशातच रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मालगुजारीपुरा येथील जयस्वाल ते धाबलिया यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. वास्तविक, हा रस्ता आधीच सिमेंटचा असून मजबूत आहे. त्यामुळे रस्त्याचीही मागणी केली नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. असे असतानाही या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंटचा रस्ता बांधला जात असल्याने या परिसरात राहणाºया नागरिकांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. या रस्ता बांधकामाची सकाळपासून चर्चा रंगली होती. आवश्यकता नसतानाही रस्त्याचे बांधकाम करून लाखोंच्या निधीचा चुराडा होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी लोकमतशी बोलताना दिली. हे नागरिकांना कळले पण, नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींना कसे काय कळले नसावे, हा संशोधनाचा विषय आहे.उंची वाढल्याने घरात शिरणार पाणीया रस्त्यालगत एका बाजूने नाली असून त्या नालीचे सहा महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. आता सिमेंटच्या पक्क्या मूळ रस्त्यापासून जवळपास फूटभर नवीन रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता वाढल्याने पावसाचे पाणी लगतच्या घरामध्ये शिरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच नुकतीच बांधलेली नाली आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडून शहरात नियोजनशून्य काम सुरू असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.बांधकामाकरिता एनओसी मिळाली कशी?प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुरु असलेल्या या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाबाबत सकाळपासून चर्चा सुरू झाली. अगोदरच पक्का रस्ता असताना त्यावर दुसरा दुसऱ्या रस्त्याला मंजुरी दिली जात नाही. विशेषत: कोविड-१९ च्या महामारीमध्ये शासनाकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे शासनाने बराचसा निधी परत मागितला आहे. असे असतानाही आवश्यकता नसताना लाखो रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करणे, अयोग्य असून या रस्त्याच्या बांधकामाला पालिकेनेही मंजुरी दिली कशी? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.आता नुकताच या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. मजबूत रस्ता असतांना त्यावर नव्याने बांधकाम करण्याचा प्रश्नच येत आहे. तो कोणता रस्ता आहे, कोणत्या फंडातून बांधल्या जात आहे याची माहिती घेतली जाईल.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका