शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:35 IST

पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे प्रतिपादन : वडनेर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.वडनेर येथे विदर्भ राज्य जनजागृती अभियानाअंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्रीहरी अणे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, सुरेंद्र पारधी, शैलेंद्र हारोंडे, सुरेश खत्री, भारत पाटील, राजेंद्र पाटील, गोकुल पाटील उपस्थित होते.अनिल जवादे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची प्राचीन काळापासून कशी लूट होत आहे. हे अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले पूर्वी शेतकऱ्यांना मोगलांनी, इंग्रजांनी लुटले आज मात्र राजकीय व्यवस्था स्वातंत्र्यानंतरही शेतकºयांना सतत लुटत आहे. ही लूट जर थांबवायची असेल तर विदर्भ राज्य निर्माण होणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. महेश माकडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणे