शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हा लघु जलाशयाला तडे; ४२ कुटुंबांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती तलाठ्यांना दिली. त्यांनी सदर माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन बाऱ्हा सोनेगाव येथील ४२ कुटुंबांना रसुलाबाद येथील विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी केली पाहणी । जिल्हाधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंत्यांना सादर करणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/विरूळ (आकाजी) : रसुलाबाद नजीकच्या कुऱ्हा जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच लघु जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या बाºहा सोनेगाव येथे कोलाम बांधवांची वस्ती असून संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील ४२ कुटुंबांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याची माहिती मिळताच वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पाटबंधारे विभाग आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सादर करणार आहे.जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती तलाठ्यांना दिली. त्यांनी सदर माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन बाऱ्हा सोनेगाव येथील ४२ कुटुंबांना रसुलाबाद येथील विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात हलविण्यात आले आहे. या संकटाच्या प्रसंगी रसुलाबादवासीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सदर कुटुंबांना आपल्या परिवारातील सदस्य असल्याचे सांगत प्राथमिक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिवाय त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येत असल्याचे रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी सांगितले.तर सदर घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड, वर्धा पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, पाटबंधारे विभागाचे दामोधरे, मेश्राम, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, हुसेनपूरचे सरपंच रवी कुरसंगे, तलाठी भोले, पोलीस पाटील श्याम काकडे यांनी कुऱ्हा जलाशयाच्या तडे गेलेल्या भिंतीची पाहणी केली. शिवाय नागरिकांशी संवाद साधला. वर्धा पाटबंधारे विभाग कुऱ्हा जलाशयाच्या पाहणीनंतर आपला अभिप्राय देणारा अहवाल तयार करून तो तातडीने त्यांच्या विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांसह जिल्हाधिकाºयांना सादर करणार आहे.जलाशय भरला १०० टक्केरसुलाबाद नजीकच्या बाऱ्हा सोनेगाव व कुरझडी या गावांच्या मधात कुऱ्हा हा लघु जलाशय आहे. सुमारे ३७ हेक्टरवर पसरलेल्या या जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता ३ दलघमी असून तो सध्या १०० टक्के भरला आहे. अशातच पूर्णपणे मातीने तयार करण्यात आलेल्या या जलाशयाच्या भिंतींना तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुरझडीवासीयांनाही सुरक्षित ठिकाणी हलविणार?कुºहा जलाशयापासून बाऱ्हा सोनेगाव हे गाव अवघ्या अर्धा किमी अंतरावर आहे. तर कुरझडी हे गाव सुमारे ४ किमी अंतरावर आहे. सध्या बाऱ्हा सोनेगाव येथील ४३ कुटुंबातील एकूण १४३ जणांना रसुलाबाद येथील सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर वेळप्रसंगी कुरझडीवासीयांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात येणार आहे. कुरझडी या गावाची लोकसंख्या १ हजार २०० इतकी असून त्यासाठीची तयारी महसूल विभागाने पूर्ण केली आहे. शिवाय वाहनही सज्ज करण्यात आले आहे.पाणी सोडण्याचा विषय विचाराधीनकुऱ्हा जलाशय सध्या १०० टक्के भरला असून या जलाशयाच्या भिंतीला तडा गेल्याचे पुढे आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी विविध पैलूंनी विचार केल्या जात असून वेळप्रसंगी धरणातून पाणीही सोडले जाणार आहे.नायब तहसीलदार तळ ठोकूनकुऱ्हा जलाशयाच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती मिळताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी आपल्या चमूसह शुक्रवारी रात्री रसुलाबाद गाठले. शिवाय त्या तेथे दुपारी उशीरापर्यंत तळ ठोकून होत्या. बारीक सारीक बाबींची माहिती जाणून घेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.‘त्या’ ब्लास्टमुळे ओढवली परिस्थिती?कुऱ्हा जलाशयाच्या निर्मितीला सुमारे ४० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. याच तलावाच्या शेजारी जिल्हा परिषदेच्यावतीने विहीर खोदण्यात आली. त्यासाठी तेथे ब्लास्ट करण्यात आले होते. त्याचाच परिणाम सध्या या जलाशयाचा भिंतीवर झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.

टॅग्स :Damधरण