शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

नऊ बीटचा भार एकाच पोलीस ठाण्यावर

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे.

भास्कर कलोडे - हिंगणघाटशहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे. यामुळे कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत पोलिसांची संख्या मात्र तोकडी आहे. ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट ठाण्यातील पोलिसांना नागरिकांच्या समस्यांना तप्तरतेने न्याय देण्यात अडसर येत आहे. तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. शहराच्या विस्तारीत भागासह ग्रामीणच्या चार बीटसाठी नव्या ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. येथील पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील काजी वॉर्ड, मातामंदिर वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, गांधी वॉर्ड, निशानपूरा, लाडकी, बुरकोनी, वाघोली तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव बीटचा समावेश आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला निरीक्षक, सहायक निरीक्षकासह, सहायक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नायक, शिपाई, वाहन चालक असे एकूण १३२ तैनाती आहे. प्रत्यक्षात अधिकारी व कर्मचारी असे एकूण १२४ जण कर्तव्यावर असून आठ कर्मचाऱ्यांची उणीव आहे. कर्तव्यावरील एकूण कर्मचाऱ्यांपैकी दररोजची साप्ताहिक सुटी, आजारी व वैकल्पिक सुट्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३० असल्याने केवळ ९० कर्मचाऱ्यांना ९ बीटच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडावी लागते. ही वास्तविकता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी पाच, स्थानिक न्यायालयीन कामकाजाठी तीन, जिल्हा न्यायालयासाठी दोन तर वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी १० व समन्स वारंट पोहचविण्यासाठी सहा अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित अधिकारी व कर्मचारी ६४ तर कामाचा व्याप मात्र अधिक अशी स्थिती आहे. यापैकी २० जणांकडे पेट्रोलिंगची जबाबदारी असल्याने त्यांचा परिणाम प्रलंबित प्रकरणाच्या तपासावार होत आहे. जिल्ह्यात हिंगणघाट शहर संवेदनशील मानल्या जाते. जिल्हा सीमेवरील दारूबंदीचा भार येथील पोलिसांवर आहे. अवैध रेती वाहतूक, सणासुदीचा बंदोबस्त, निवडणूक सभा, बैठक, अपघात, शेतकरी आत्महत्या, खून, मारामाऱ्या व नैसर्गिक आपत्ती यासह रेल्वे गेट नं. १४ च्या चालू बंदमुळे दिवसातून अनेकदा विस्कळीत होणारी वाहतूक हिंगणघाट पोलिसाकरिता डोकेदुखी ठरते. काळानुसार गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे पद्धत सुद्धा बदलली तालुक्यातील लघु उद्योगाची संख्या वाढतीवर असून परप्रांतीय मजुरांची संख्याही येथे अधिक आहे. पोलिसांची संख्या व पोलिसांवरील कामाचा भार याची जनसामान्यांना जाणीव असली नसली तरी कायदा व सुव्यवस्था मात्र कायम राहावी, गुन्ह्यांचा शोध तत्परतेने लागावा, नवीन गुन्हे घडू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र याकरिता येथील यंत्रणा तोकडी पडत असल्याची बाब प्रकर्षांने जाणवते. अशा स्थितीत जनतेला न्याय देण्यासाठी थोडी फार पोलीस संख्या वाढविण्याऐवजी शहरात स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती केल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल. तसेच जबाबदारी पार पाडताना कोणतीच समस्या भेडसावणार नाही.