शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नऊ बीटचा भार एकाच पोलीस ठाण्यावर

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे.

भास्कर कलोडे - हिंगणघाटशहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्येत भर पडत असताना ग्रामीणचे चार आणि शहरातील पाच अशा एकूण नऊ बीटचा भार सद्यस्थितीत हिंगणघाट पोलीस स्टेशनवर आहे. यामुळे कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत पोलिसांची संख्या मात्र तोकडी आहे. ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट ठाण्यातील पोलिसांना नागरिकांच्या समस्यांना तप्तरतेने न्याय देण्यात अडसर येत आहे. तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. शहराच्या विस्तारीत भागासह ग्रामीणच्या चार बीटसाठी नव्या ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. येथील पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील काजी वॉर्ड, मातामंदिर वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, गांधी वॉर्ड, निशानपूरा, लाडकी, बुरकोनी, वाघोली तसेच समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव बीटचा समावेश आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला निरीक्षक, सहायक निरीक्षकासह, सहायक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नायक, शिपाई, वाहन चालक असे एकूण १३२ तैनाती आहे. प्रत्यक्षात अधिकारी व कर्मचारी असे एकूण १२४ जण कर्तव्यावर असून आठ कर्मचाऱ्यांची उणीव आहे. कर्तव्यावरील एकूण कर्मचाऱ्यांपैकी दररोजची साप्ताहिक सुटी, आजारी व वैकल्पिक सुट्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३० असल्याने केवळ ९० कर्मचाऱ्यांना ९ बीटच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडावी लागते. ही वास्तविकता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी पाच, स्थानिक न्यायालयीन कामकाजाठी तीन, जिल्हा न्यायालयासाठी दोन तर वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी १० व समन्स वारंट पोहचविण्यासाठी सहा अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित अधिकारी व कर्मचारी ६४ तर कामाचा व्याप मात्र अधिक अशी स्थिती आहे. यापैकी २० जणांकडे पेट्रोलिंगची जबाबदारी असल्याने त्यांचा परिणाम प्रलंबित प्रकरणाच्या तपासावार होत आहे. जिल्ह्यात हिंगणघाट शहर संवेदनशील मानल्या जाते. जिल्हा सीमेवरील दारूबंदीचा भार येथील पोलिसांवर आहे. अवैध रेती वाहतूक, सणासुदीचा बंदोबस्त, निवडणूक सभा, बैठक, अपघात, शेतकरी आत्महत्या, खून, मारामाऱ्या व नैसर्गिक आपत्ती यासह रेल्वे गेट नं. १४ च्या चालू बंदमुळे दिवसातून अनेकदा विस्कळीत होणारी वाहतूक हिंगणघाट पोलिसाकरिता डोकेदुखी ठरते. काळानुसार गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे पद्धत सुद्धा बदलली तालुक्यातील लघु उद्योगाची संख्या वाढतीवर असून परप्रांतीय मजुरांची संख्याही येथे अधिक आहे. पोलिसांची संख्या व पोलिसांवरील कामाचा भार याची जनसामान्यांना जाणीव असली नसली तरी कायदा व सुव्यवस्था मात्र कायम राहावी, गुन्ह्यांचा शोध तत्परतेने लागावा, नवीन गुन्हे घडू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र याकरिता येथील यंत्रणा तोकडी पडत असल्याची बाब प्रकर्षांने जाणवते. अशा स्थितीत जनतेला न्याय देण्यासाठी थोडी फार पोलीस संख्या वाढविण्याऐवजी शहरात स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती केल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल. तसेच जबाबदारी पार पाडताना कोणतीच समस्या भेडसावणार नाही.