शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाठीवर ४० हजार किलो वजन अन् उणे ८ अंश तापमान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:31 IST

पाठीवर ४० किलोचे वजन घेऊन ८ अंश तापमानात चढाई सुरू झाली. थंडी, वादळ यांचा सामना करीत ७ दिवसांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. तेथे तापमान होते, उणे ४० अंश सेंटीग्रेड! अंगात त्राण नाही.

ठळक मुद्देराकेश काळे : बहारचा अनुभवकथन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतवर्धा : पाठीवर ४० किलोचे वजन घेऊन ८ अंश तापमानात चढाई सुरू झाली. थंडी, वादळ यांचा सामना करीत ७ दिवसांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. तेथे तापमान होते, उणे ४० अंश सेंटीग्रेड! अंगात त्राण नाही. शिवाय ५० किमी वेगाने वाहणारा वारा! अशाही स्थितीत शिखरावर भारताचा तिरंगा हातात घेऊन फोटो काढताना ऊर भरून आला. आजही हा प्रसंग आठविला की अंगावर रोमांच उभे राहतात, हा रोमांचक अनुभव अंटार्क्टीकातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन सर करणारे भारतीय वायूसेनेत भूदल प्रशिक्षक पदावर कार्यरत राकेश काळे यांनी कथन केला.बहार नेचर फाऊंडेशनतर्फे आयोजित अंटार्क्टीका मोहिमेच्या अनुभवकन कार्यक्रमात ते बोलत होते. जवाहर नवोदय विद्यालय वर्धाचे विद्यार्थी राहिलेले राकेश काळे वयाच्या १७ वर्षी भारतीय वायूसेनेत भरती झाले. यानंतर त्यांनी पर्वतारोहणाचा प्राथमिक व उच्च, असे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केले. भारतातील ११ पर्वतारोहण मोहिमेत त्यांनी भाग घेतला. पैकी नऊ शिखरे पादाक्रांत केली. उर्वरित दोनमध्ये विविध अडचणींमुळे अपयश आले. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या त्रिशुल-१ या शिखर मोहिमेत त्यांचा सहकारी मरण पावला. हा आघात विसरत नाही, तोच त्यांना अंटार्क्टीका मोहिमेत निवड झाल्याचे वरिष्ठांनी सांगितले. मरणाची भीती न बाळगता त्यांनी या मोहिमेवर जाण्याचे ठरविले. मृत्यू तर रोड अपघातातही येऊ शकतो, असे त्यांनी मनाला समजाविले व पाच जणांच्या भारतीय वायुसेनेच्या चमूसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पाच लोकांनी अंटार्क्टीकातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन २५ डिसेंबर २०१७ रोजी सर केले. हा सर्व साहसिक प्रवास राकेश यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून मांडला. शिखरावर पोहोचलो त्यावेळी ‘आपण जग जिंकले, मैन ने तो जिंदगी जी ली’ अशी भावना झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढील मिशन दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमंजारो राहणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.प्रहार सामाजिक संस्थेचे प्रा. मोहन गुजरकर यांनी २० हजार फु ट उंच हिमालय पायथा सर केला. त्याची रोमांचक आठवण सांगितली. प्रास्ताविक करीत परिचय बहारचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांनी दिला. आभार विरखडे यांनी मानले.