शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पुलगाव शहराला झुकते माप देवून स्मार्ट सिटी बनवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:56 IST

आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात विविध योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करीत आहे.

ठळक मुद्देरणजीत पाटील : २० महिन्यांतील कामांचा शुभारंभ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात विविध योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करीत आहे. पुलगाव येथील नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकून येथील सत्ता दिल्यास आम्ही पुलगाव शहराला झुकते माप देत या शहराला स्मार्ट सिटी बनऊ, असे आश्वासन राज्याचे नगर विकास निधी, न्याय कौशल्यविकास गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.स्थानीय नगर परिषदेने मागील २० महिन्यात केलेल्या विकास कामाचा शुभारंभ व नवीन कामांचा श्रीगणेशा ना. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शीतल गाते तर प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. डॉ. रामदास आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, महाराष्ट्र ओबीसी मंडळाने सरचिटणीस संजय गाते, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा सचिव नितीन बडगे, कपील शुक्ला यांची उपस्थिती होती.खा. तडस म्हणाले, नगर परिषद म्हणजे स्थानिक विकासाचा रथ आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे या रथाची चाके व त्यांच्यातील कल्पक विचार हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या रथाचा सारथी असतो. या सर्वांचा योग्य समन्वय असला तरच शहर विकासाचा रथ व्यवस्थित चालतो. मागील सहा दशकात या भागात काही अपवाद वगळता काँग्रेसची सत्ता राहिली. मात्र, या काळात शहराचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास केल्या गेल्याची बोचरी टिका खा. तडस यांनी विरोधकांवर केली.यंदा पुलगाव येथील नागरिकांनी या नगर परिषदेवर भाजपाला सत्ता दिली. म्हणून आम्ही विकासाचा केंद्र हे गाव ठरविले. या शहराला सर्व बाजूने राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचा, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात या शहराचा नावलौकि व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. पुलगाव, नाचणगाव या मार्गाचे चौपदरीकरणाची मागणीही ना. पाटील यांच्याकडे खा. तडस यांनी केली. याप्रसंगी आ. डॉ. रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनीही मार्गदर्शन केले.उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरवकार्यक्रमादम्यान नगर परिषदेच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते पुलगाव शहराच्या विकास कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल नगरसेविका मतता बडगे, नितीन बडगे व मुख्याध्यापक विठ्ठल वानखेडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्तींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस