शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:17 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकºयांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : खरीप नियोजन आढावा बैठक, विविध विषयांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जि.प.च्या सभागृहात २०१९-२० खरीप हंगामाची नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, इतर विभागाच्या बैठकींपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्त्वाची आहे. सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सौर कृषीपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असले तर अशा एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावेत. पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रतीक्षा करू नका. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहोचले पाहिजे. यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करावे. शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून हे मेळावे घेण्यात यावे. केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता मेळावे घेऊ नका. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नसून कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाचे नियोजन कराशेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाबाबत योग्य नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी सहाय्यकांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी. नियमाच्या चौकटीत राहून काम करायचे असले तरी शेतकऱ्यांना मानवतेची वागणूक द्या. प्रतिबंधित बीटी, निकृष्ट दर्जाची खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कठोरच कारवाई करा. ही कारवाई करताना कुठलीही हयगय अधिकाऱ्यांनी करू नये. नामधारी तपासणी मोहीम न राबविता त्याला आणखी कसे प्रभावी करता येईल, यावर विचार करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी. खत आणि बियाण्यांचा काळाबाजार याबाबत एखादी गुप्त माहिती मिळाल्यावर तातडीने कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार