शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:17 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकºयांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : खरीप नियोजन आढावा बैठक, विविध विषयांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जि.प.च्या सभागृहात २०१९-२० खरीप हंगामाची नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, इतर विभागाच्या बैठकींपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्त्वाची आहे. सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सौर कृषीपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असले तर अशा एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावेत. पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रतीक्षा करू नका. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहोचले पाहिजे. यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करावे. शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून हे मेळावे घेण्यात यावे. केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता मेळावे घेऊ नका. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नसून कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाचे नियोजन कराशेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाबाबत योग्य नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी सहाय्यकांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी. नियमाच्या चौकटीत राहून काम करायचे असले तरी शेतकऱ्यांना मानवतेची वागणूक द्या. प्रतिबंधित बीटी, निकृष्ट दर्जाची खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कठोरच कारवाई करा. ही कारवाई करताना कुठलीही हयगय अधिकाऱ्यांनी करू नये. नामधारी तपासणी मोहीम न राबविता त्याला आणखी कसे प्रभावी करता येईल, यावर विचार करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी. खत आणि बियाण्यांचा काळाबाजार याबाबत एखादी गुप्त माहिती मिळाल्यावर तातडीने कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार