शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:17 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकºयांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : खरीप नियोजन आढावा बैठक, विविध विषयांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जि.प.च्या सभागृहात २०१९-२० खरीप हंगामाची नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, इतर विभागाच्या बैठकींपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्त्वाची आहे. सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सौर कृषीपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असले तर अशा एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावेत. पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रतीक्षा करू नका. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहोचले पाहिजे. यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करावे. शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून हे मेळावे घेण्यात यावे. केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता मेळावे घेऊ नका. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नसून कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाचे नियोजन कराशेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाबाबत योग्य नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी सहाय्यकांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी. नियमाच्या चौकटीत राहून काम करायचे असले तरी शेतकऱ्यांना मानवतेची वागणूक द्या. प्रतिबंधित बीटी, निकृष्ट दर्जाची खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कठोरच कारवाई करा. ही कारवाई करताना कुठलीही हयगय अधिकाऱ्यांनी करू नये. नामधारी तपासणी मोहीम न राबविता त्याला आणखी कसे प्रभावी करता येईल, यावर विचार करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी. खत आणि बियाण्यांचा काळाबाजार याबाबत एखादी गुप्त माहिती मिळाल्यावर तातडीने कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार