शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:17 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकºयांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : खरीप नियोजन आढावा बैठक, विविध विषयांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जि.प.च्या सभागृहात २०१९-२० खरीप हंगामाची नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, इतर विभागाच्या बैठकींपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्त्वाची आहे. सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सौर कृषीपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असले तर अशा एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावेत. पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रतीक्षा करू नका. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहोचले पाहिजे. यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करावे. शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून हे मेळावे घेण्यात यावे. केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता मेळावे घेऊ नका. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नसून कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाचे नियोजन कराशेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाबाबत योग्य नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी सहाय्यकांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी. नियमाच्या चौकटीत राहून काम करायचे असले तरी शेतकऱ्यांना मानवतेची वागणूक द्या. प्रतिबंधित बीटी, निकृष्ट दर्जाची खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कठोरच कारवाई करा. ही कारवाई करताना कुठलीही हयगय अधिकाऱ्यांनी करू नये. नामधारी तपासणी मोहीम न राबविता त्याला आणखी कसे प्रभावी करता येईल, यावर विचार करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी. खत आणि बियाण्यांचा काळाबाजार याबाबत एखादी गुप्त माहिती मिळाल्यावर तातडीने कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार