शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

प्राणी-पक्ष्यांवर जलसंकट

By admin | Updated: April 18, 2015 01:50 IST

सध्या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात कधी उन्ह, कधी पाऊस अशी स्थिती सुरू असली तरी पाणीटचाईची झळ बहुतेक गावखेड्यांपासून शहरांपर्यंत पोहोचत आहे.

वर्धा : सध्या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात कधी उन्ह, कधी पाऊस अशी स्थिती सुरू असली तरी पाणीटचाईची झळ बहुतेक गावखेड्यांपासून शहरांपर्यंत पोहोचत आहे. मानवांपेक्षा प्राणी, पक्ष्यांवर हे जलसंकट भीषणपणे घोंघावत आहे. एखाद्या डबक्यात पाणी पिताना असे पक्षी, प्राणी दिसल्यावर हे चित्र प्रकर्षाने जाणवते. जिल्ह्यातील हिरवळ कमी होत आहे. जंगले विरळ होत असून तिथे मानवी वस्ती वाढत अहे. त्यामुळे जंगलाचे राजे असलेले पक्षी, प्राणी यांचे निवारे हरवून अन्नाच्या शोधात अनेक पक्षी, प्राणी गावखेड्यातच नव्हे तर शहरात येत आहे. येथे त्यांना थोडेफार अन्न मिळून जात असले तरी आवश्यक असलेले पाणी मिळणे मात्र दुरापास्त झाले आहे. मोकाट जनावरे, कुत्री यांच्यासह माकडांचा गावांमध्ये तसेच खेड्यांमध्ये ठिय्या दिसतो. सदर जनावरे सध्या सर्वत्र पिण्याचे पाणी शोधत असतात. अनेकवार कुठेही पाणी न मिळाल्याने हातपंप, शासकीय नळ अशा ठिकाणी साचलेल्या डबक्यातील पाण्यात त्यांना आपली तहान भागवावी लागते. चिमणी, कावळे व इतरही पक्ष्यांना केवळ पिण्यासाठीच पाण्याची गरज असते असे नव्हे तर या पक्ष्यांना उन्हाच्या दाहकतेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी सतत पाण्यात डुंबणे गरजेचे असते. पण शुद्ध पाणीच नसल्याने नाल्यातील पाण्यात डुंबण्याची वेळ पक्ष्यांवर आली आहे.(शहर प्रतिनिधी)