शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

प्राणी-पक्ष्यांवर जलसंकट

By admin | Updated: April 18, 2015 01:50 IST

सध्या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात कधी उन्ह, कधी पाऊस अशी स्थिती सुरू असली तरी पाणीटचाईची झळ बहुतेक गावखेड्यांपासून शहरांपर्यंत पोहोचत आहे.

वर्धा : सध्या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात कधी उन्ह, कधी पाऊस अशी स्थिती सुरू असली तरी पाणीटचाईची झळ बहुतेक गावखेड्यांपासून शहरांपर्यंत पोहोचत आहे. मानवांपेक्षा प्राणी, पक्ष्यांवर हे जलसंकट भीषणपणे घोंघावत आहे. एखाद्या डबक्यात पाणी पिताना असे पक्षी, प्राणी दिसल्यावर हे चित्र प्रकर्षाने जाणवते. जिल्ह्यातील हिरवळ कमी होत आहे. जंगले विरळ होत असून तिथे मानवी वस्ती वाढत अहे. त्यामुळे जंगलाचे राजे असलेले पक्षी, प्राणी यांचे निवारे हरवून अन्नाच्या शोधात अनेक पक्षी, प्राणी गावखेड्यातच नव्हे तर शहरात येत आहे. येथे त्यांना थोडेफार अन्न मिळून जात असले तरी आवश्यक असलेले पाणी मिळणे मात्र दुरापास्त झाले आहे. मोकाट जनावरे, कुत्री यांच्यासह माकडांचा गावांमध्ये तसेच खेड्यांमध्ये ठिय्या दिसतो. सदर जनावरे सध्या सर्वत्र पिण्याचे पाणी शोधत असतात. अनेकवार कुठेही पाणी न मिळाल्याने हातपंप, शासकीय नळ अशा ठिकाणी साचलेल्या डबक्यातील पाण्यात त्यांना आपली तहान भागवावी लागते. चिमणी, कावळे व इतरही पक्ष्यांना केवळ पिण्यासाठीच पाण्याची गरज असते असे नव्हे तर या पक्ष्यांना उन्हाच्या दाहकतेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी सतत पाण्यात डुंबणे गरजेचे असते. पण शुद्ध पाणीच नसल्याने नाल्यातील पाण्यात डुंबण्याची वेळ पक्ष्यांवर आली आहे.(शहर प्रतिनिधी)