शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:08 IST

शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.

ठळक मुद्देवळविलेले पाणीही संपले : आता पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.शहरवासीयांना पाणी पुरविण्याकरिता नगरपरिषदेच्यावतीने कायद्याचे उलंघन करून सिंचन विभागाचे पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत आणले. हे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहरातील नागरिकांना पाठविले. यात प्रतापनगर व साबळे प्लॉट परिसर वगळता इतर भागात पाणी पोहोचले. यामुळे नागरिकांकडून पाण्याचा साठा करण्यात आला. यातून दोन दिवसाची गरज भागेल पण नंतर काय करावे अशी चिंता आता पालिका प्रशासनासह वर्धेकर नागरिकांना पडली आहे. येळाकेळी येथील नदी खोदून पाणी जमा करून एक दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. आता तसे करणे शक्य नसल्याचे दिसून आले. हा प्रकार अधिक प्रमाणात केल्यास आसपासच्या परिसरात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पाऊस येण्याची सध्या चिन्हे दिसत नाही. तर धाम प्रकल्पातील पाणी सोडण्याकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीत पाणी येणे शक्य नाही. यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे धाम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चर्चेत काय मार्ग निघतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.नगर परिषदेच्या वतीने सिंचन विभागाचे पाणी असे वळविले होतेनगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने तयार केलेल्या बंधाऱ्यात पाण्याचा एकही थेंब दिसत नसल्याने रविवारी सकाळच्या सुमारास पालिकेच्यावतीने या परिसरात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत सिंचन विभागाचे पाणी सोडले. यामुळे शहरातील काही नळांना पाणी आले. आता मात्र येथे पाण्याचा ठणठणाट झाला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे.