शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:08 IST

शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.

ठळक मुद्देवळविलेले पाणीही संपले : आता पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.शहरवासीयांना पाणी पुरविण्याकरिता नगरपरिषदेच्यावतीने कायद्याचे उलंघन करून सिंचन विभागाचे पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत आणले. हे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहरातील नागरिकांना पाठविले. यात प्रतापनगर व साबळे प्लॉट परिसर वगळता इतर भागात पाणी पोहोचले. यामुळे नागरिकांकडून पाण्याचा साठा करण्यात आला. यातून दोन दिवसाची गरज भागेल पण नंतर काय करावे अशी चिंता आता पालिका प्रशासनासह वर्धेकर नागरिकांना पडली आहे. येळाकेळी येथील नदी खोदून पाणी जमा करून एक दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. आता तसे करणे शक्य नसल्याचे दिसून आले. हा प्रकार अधिक प्रमाणात केल्यास आसपासच्या परिसरात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पाऊस येण्याची सध्या चिन्हे दिसत नाही. तर धाम प्रकल्पातील पाणी सोडण्याकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीत पाणी येणे शक्य नाही. यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे धाम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चर्चेत काय मार्ग निघतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.नगर परिषदेच्या वतीने सिंचन विभागाचे पाणी असे वळविले होतेनगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने तयार केलेल्या बंधाऱ्यात पाण्याचा एकही थेंब दिसत नसल्याने रविवारी सकाळच्या सुमारास पालिकेच्यावतीने या परिसरात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत सिंचन विभागाचे पाणी सोडले. यामुळे शहरातील काही नळांना पाणी आले. आता मात्र येथे पाण्याचा ठणठणाट झाला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे.