शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वर्ध्यात पाणीबाणी; उसनवारीवर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:43 IST

शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे.

ठळक मुद्देआता हातपंपच ठरताहेत आधार : पाच दिवसांआड पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे. अशा प्रकारे पाण्याच्या उसणवारीवर वर्धेकर सध्या तहान भागविताना दिसून येत आहेत.मार्च महिना उलटताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. वर्धा शहरासह लगतच्या तेरा गावांना धामनदीतून येळाकेळी आणि पवनार या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. अर्ध्या शहराला पवनार तर अर्ध्या शहराला येळाकेळी येथून नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. तसेच लगतच्या तेरा गावांना येळाकेळी येथूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा होतो. सर्वाधिक पाण्याची उचल ही येळाकेळी येथूनच केली जाते. अल्प पर्जन्यमानामुळे धामनदीपात्रातच ठणठणाट असल्याने पाटबंधारे विभागाद्वारे महिन्यातून एकदाच पाणी सोडले जात आहे. ते पाणी पवनार व येळाकेळीपर्यंत पोहोचण्याकरिता एक दिवसाचा कालावधी लागतो. हे पाणी शहरासह तेरा गावांना महिनाभर पुरवायचे असल्यामुळे शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.लगतच्या गावांमध्ये तर पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत शहरासह लगतच्या गावातही पाणीबाणी निर्माण झाली असून ही तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दिवसात पाण्याअभावी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असून सध्या हातपंपाचा आधार मिळत आहे. परंतु, दिवसभर हातपंपावर घालविणे शक्यता नसल्याने शहरासह लगतच्या गावातील नागरिकांनी आता पाण्याकरिता ‘एकमेका सहाय्य करू’ अशी भूमिका घेतली आहे.अशी चालतेय देवाण-घेवाणवर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, मसाळा, वरुड, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), वायगाव, दत्तपूर व सालोड (हि.) या गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी पुरवठा होतो; तर वर्धा शहरात नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वर्धा शहरालगत प्रामुख्याने पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, सिंदी (मेघे) ही गावे आहेत. त्यामुळे सीमेवरील काही नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठविण्याचे साहित्य सीमेच्या अल्याडपल्याड नेऊन ठेवले आहे. शहरीभागातील नळ आले की, ग्रामीण भागातील नागरिक पाणी नेतात तसेच ग्रामीण भागातील नळ आले तर शहरी भागातील नागरिक पाणी घेतात. अशा प्रकारे पाण्याची देवाण-घेवाण करून तहान भागविण्याचा खटाटोप सुरू आहे.नागरिकांच्या खिशालाही झळाउन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई सुरू झाल्याने बहुतांश नागरिकांनी नळयोजनेवर अवलंबून न राहता भूगर्भ पोखरून बोअरवेल करण्यावर भर दिला. तसेच काहींना पाण्याची साठवणूक करण्याकरिता प्लास्टिकचे ड्रम किंवा इतर भांडी घेण्यासाठी खिसा खाली करावा लागला. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात सध्या अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पिण्याकरिता मिनरल वॉटरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्याकरिता नागरिकांच्या खिशालाही झळ सोसावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई