शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

वर्ध्यात पाणीबाणी; उसनवारीवर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:43 IST

शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे.

ठळक मुद्देआता हातपंपच ठरताहेत आधार : पाच दिवसांआड पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे. अशा प्रकारे पाण्याच्या उसणवारीवर वर्धेकर सध्या तहान भागविताना दिसून येत आहेत.मार्च महिना उलटताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. वर्धा शहरासह लगतच्या तेरा गावांना धामनदीतून येळाकेळी आणि पवनार या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. अर्ध्या शहराला पवनार तर अर्ध्या शहराला येळाकेळी येथून नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. तसेच लगतच्या तेरा गावांना येळाकेळी येथूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा होतो. सर्वाधिक पाण्याची उचल ही येळाकेळी येथूनच केली जाते. अल्प पर्जन्यमानामुळे धामनदीपात्रातच ठणठणाट असल्याने पाटबंधारे विभागाद्वारे महिन्यातून एकदाच पाणी सोडले जात आहे. ते पाणी पवनार व येळाकेळीपर्यंत पोहोचण्याकरिता एक दिवसाचा कालावधी लागतो. हे पाणी शहरासह तेरा गावांना महिनाभर पुरवायचे असल्यामुळे शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.लगतच्या गावांमध्ये तर पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत शहरासह लगतच्या गावातही पाणीबाणी निर्माण झाली असून ही तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दिवसात पाण्याअभावी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असून सध्या हातपंपाचा आधार मिळत आहे. परंतु, दिवसभर हातपंपावर घालविणे शक्यता नसल्याने शहरासह लगतच्या गावातील नागरिकांनी आता पाण्याकरिता ‘एकमेका सहाय्य करू’ अशी भूमिका घेतली आहे.अशी चालतेय देवाण-घेवाणवर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, मसाळा, वरुड, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), वायगाव, दत्तपूर व सालोड (हि.) या गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी पुरवठा होतो; तर वर्धा शहरात नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वर्धा शहरालगत प्रामुख्याने पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, सिंदी (मेघे) ही गावे आहेत. त्यामुळे सीमेवरील काही नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठविण्याचे साहित्य सीमेच्या अल्याडपल्याड नेऊन ठेवले आहे. शहरीभागातील नळ आले की, ग्रामीण भागातील नागरिक पाणी नेतात तसेच ग्रामीण भागातील नळ आले तर शहरी भागातील नागरिक पाणी घेतात. अशा प्रकारे पाण्याची देवाण-घेवाण करून तहान भागविण्याचा खटाटोप सुरू आहे.नागरिकांच्या खिशालाही झळाउन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई सुरू झाल्याने बहुतांश नागरिकांनी नळयोजनेवर अवलंबून न राहता भूगर्भ पोखरून बोअरवेल करण्यावर भर दिला. तसेच काहींना पाण्याची साठवणूक करण्याकरिता प्लास्टिकचे ड्रम किंवा इतर भांडी घेण्यासाठी खिसा खाली करावा लागला. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात सध्या अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पिण्याकरिता मिनरल वॉटरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्याकरिता नागरिकांच्या खिशालाही झळ सोसावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई