शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

तीन वर्षांत जलयुक्तची ५,९९१ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:39 IST

पावसाचे पाणी नदी नाल्यातून वाहून जात असल्याने त्याचा सिंचनाकरिता वापर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेतून झालेल्या कामांत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाळा तोंडावर : झालेल्या कामांतून मोठ्या प्रमाणात जलसंचयाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाचे पाणी नदी नाल्यातून वाहून जात असल्याने त्याचा सिंचनाकरिता वापर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेतून झालेल्या कामांत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. वर्धेत गत तीन वर्षांत या अभियानातून तब्बल जिल्ह्यात ५ हजार ९९१ कामे झाली आहेत. तर ९२६ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.यंदाच्या सत्रात जलयुक्तची १ हजार ४८२ कामे मंजूर झाली आहे. त्यातील आतापर्यंत ५५६ कामे पूर्ण झाली आहेत.उर्वरीत कामे प्रगतीपथावर असून पाऊस येण्यापूर्वी ती कामे पूर्णत्त्वास आणण्याकरिता प्रशासन कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.जलयुक्त अभियान मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून ओळखले जात आहे. या अभियानातून जिल्ह्यात झालेल्या कामांवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. या खर्चाचे वर्धा जिल्ह्यात फलीत झाल्याचे दिसून आले आहे. कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात अभियानामुळे सिंचनाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. सिंचन क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनातही वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी या अभियानातून झालेल्या जससंचयातून आपल्या शेतात पाणी घेत मोठ्या प्रमाणात ओलीत केल्याचे सांगण्यात आले आहे.अभियान सुरू झाले झाले त्या काळापासूनच जिल्ह्यात या कामाला शेतकऱ्यांकडून बऱ्यापैकी सहकार्य मिळाल्याचे दिसून आले. या अभियानातून जिल्ह्यातील अनेक नाले सरळ झाले, नद्यांचा अडलेला प्रवाह मोकळा करण्यात आला. गावात शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारे नाले सरळ झाले. पर्यायाने त्यांच्या शेतालगत पाणी आल्याने सिंचनाची सुविधा आली.वर्धा जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ३ हजार ७० कामे पूर्ण झाली. या कामांतून जिल्ह्यात ३७ हजार ५४८ टीएमसी जलसाठा निर्माण झाला होता. २०१६-१७ मध्ये २ हजार ३०५ कामे झाली. या कामातून २४ हजार ५७७ टीएमसी जलसाठा झाल्याचे सांगण्यात आले. २०१७-१८ मध्ये ५५६ कामे पूर्ण झाली आहे. या कामातून १ हजार ३१७ टीएमसी जलसाठा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अनेक कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा ठरणाºया या जलयुक्त अभियानात अनेक सामाजिक संस्थांनी आपले पाठबळ दिल्याचेही जिल्ह्यात झालेल्या कामावरून दिसून आले आहे. त्याचा लाभ काय हे लवकरच कळेल.सिंचन क्षमतेत कमालीची वाढजिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे पूर्णत्त्वास येत असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे आता दिसत आहे. या कामांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या जलयुक्त शिवारच्या कामातून जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानातून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शेततळे केले आहे. यात पाणी साठवण झाल्याने काही शेतकऱ्यांनी तर यातून दुहेरी व्यवसाय सुरू केला असून दुहेरी नफा कमविण्याचा प्रयत्नही केला आहे. शेततळ्यात साचलेल्या पाण्यात मच्छीपालनही काही शेतकºयांनी केले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतालगत नाल्यात पाणी अडल्याने त्यांच्या विहिरीचे पाणी भर उन्हाळ्यात कायम असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Waterपाणी