शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वन्यप्राणी गावांकडे

By admin | Updated: May 9, 2015 02:05 IST

तालुक्यातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या वन्यप्राणी तहान भागविण्याकरिता गावांच्या दिशेने धाव घेत आहे.

आर्वी : तालुक्यातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या वन्यप्राणी तहान भागविण्याकरिता गावांच्या दिशेने धाव घेत आहे. यात शेतातील भाजीपाल्याच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अपघाताचे प्रमाण वाढीत आहे. तालुक्याचा काही भाग हा जंगलव्याप्त आहे. जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न अगोदरच बिकट रूप धारण करीत असताना खरांगणा येथून काही अंतरावर सुरू होणाऱ्या जंगलात वास्तव्य करणारे प्राणी गावाच्या दिशेने धाव घेत आहे. महाकाळी येथील जलाशयाच्या काठावर हे प्राणी आपला तहान भागविताना पाहावयास मिळतात. या भागात असलेल्या शेतांमध्ये भुईमूग, संत्रा यासह इतर पिकांची लागवड केली आहे. या पिकांवर प्राणी ताव मारत असल्याने नुकसान होत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे केल्या जात आहे. मात्र उपाययोजना होताना दिसत नाही. आर्वी शहरापासून अवघ्या १५ कि़मी. अंतरावर असलेल्या धनोडी(ब.) गावालगत निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती झाली. या प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली. पाण्याच्या दिशेने आलेली जंगली श्वापदे धनोडे भागातील धरणाकाठच्या शेतांमधील पिकांचा फडशा पाडत आहेत. धरणातून नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याच्या जोरावर घेण्यात आलेली पिके संकटात सापळली आहेत. रस्त्याकाठच्या गावामध्ये रात्रीच्या सुमारास रोह्यांचे दर्शन होताना दिसते. डुकरांचे कळप सुसाट वेगात आर्वी-पुलगाव मार्ग ओलांडताना दिसतात. हा प्रकार वर्धमनेरी गावालगत वाहणाऱ्या नदीच्या पुलावर आढळतो. रोहणा ते पिंपळखुटा जाणाऱ्या मार्गावरील जंगलात असलेल्या वन्यप्राण्यांनी गावापर्यंत धाव घेतली आहे. चोरांबा, बोदड येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विरुळ, रसुलाबाद, कृष्णापूर, रामपूर, वडाळा, वाई आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याच्या शोधार्थ येणाऱ्या वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. आर्वी ते कौंडण्यपूर जाणाऱ्या मार्गावरील गावामधील नागरिकांकडून वन्यप्राण्यांबाबतच्या तक्रारी ही नित्याचीच बाब झाली आहे. टाकरखेड येथील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांनी मोठे नुकसान केले. नांदपूर येथे पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या प्राण्यांमुळे दुचाकी चालकांचे किरकोळ अपघात झाले. जंगलामध्ये वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी नाही. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाचा जीव उन्हाने कासावीस होतो. त्यामुळे स्वत:ची तहान भागविण्यासाठी सदर जनावरे ही गावाकडे धाव घेतात. त्यामुळे ही बाब वनविभागाने गांभिर्याने घेत वन्यप्राण्यांच्या पाण्याची ठोस व्यवस्था जंगलातच करावी, अशी मागणी वन्यप्रेमी आणि शेतकरी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)