शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

पाण्यासाठी वन्यप्राणी गावांकडे

By admin | Updated: May 9, 2015 02:05 IST

तालुक्यातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या वन्यप्राणी तहान भागविण्याकरिता गावांच्या दिशेने धाव घेत आहे.

आर्वी : तालुक्यातील जंगलांमध्ये वास्तव्यास असलेल्या वन्यप्राणी तहान भागविण्याकरिता गावांच्या दिशेने धाव घेत आहे. यात शेतातील भाजीपाल्याच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अपघाताचे प्रमाण वाढीत आहे. तालुक्याचा काही भाग हा जंगलव्याप्त आहे. जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न अगोदरच बिकट रूप धारण करीत असताना खरांगणा येथून काही अंतरावर सुरू होणाऱ्या जंगलात वास्तव्य करणारे प्राणी गावाच्या दिशेने धाव घेत आहे. महाकाळी येथील जलाशयाच्या काठावर हे प्राणी आपला तहान भागविताना पाहावयास मिळतात. या भागात असलेल्या शेतांमध्ये भुईमूग, संत्रा यासह इतर पिकांची लागवड केली आहे. या पिकांवर प्राणी ताव मारत असल्याने नुकसान होत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे केल्या जात आहे. मात्र उपाययोजना होताना दिसत नाही. आर्वी शहरापासून अवघ्या १५ कि़मी. अंतरावर असलेल्या धनोडी(ब.) गावालगत निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती झाली. या प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली. पाण्याच्या दिशेने आलेली जंगली श्वापदे धनोडे भागातील धरणाकाठच्या शेतांमधील पिकांचा फडशा पाडत आहेत. धरणातून नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याच्या जोरावर घेण्यात आलेली पिके संकटात सापळली आहेत. रस्त्याकाठच्या गावामध्ये रात्रीच्या सुमारास रोह्यांचे दर्शन होताना दिसते. डुकरांचे कळप सुसाट वेगात आर्वी-पुलगाव मार्ग ओलांडताना दिसतात. हा प्रकार वर्धमनेरी गावालगत वाहणाऱ्या नदीच्या पुलावर आढळतो. रोहणा ते पिंपळखुटा जाणाऱ्या मार्गावरील जंगलात असलेल्या वन्यप्राण्यांनी गावापर्यंत धाव घेतली आहे. चोरांबा, बोदड येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विरुळ, रसुलाबाद, कृष्णापूर, रामपूर, वडाळा, वाई आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याच्या शोधार्थ येणाऱ्या वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. आर्वी ते कौंडण्यपूर जाणाऱ्या मार्गावरील गावामधील नागरिकांकडून वन्यप्राण्यांबाबतच्या तक्रारी ही नित्याचीच बाब झाली आहे. टाकरखेड येथील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांनी मोठे नुकसान केले. नांदपूर येथे पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या प्राण्यांमुळे दुचाकी चालकांचे किरकोळ अपघात झाले. जंगलामध्ये वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी नाही. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाचा जीव उन्हाने कासावीस होतो. त्यामुळे स्वत:ची तहान भागविण्यासाठी सदर जनावरे ही गावाकडे धाव घेतात. त्यामुळे ही बाब वनविभागाने गांभिर्याने घेत वन्यप्राण्यांच्या पाण्याची ठोस व्यवस्था जंगलातच करावी, अशी मागणी वन्यप्रेमी आणि शेतकरी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)