शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नळ योजनेच्या टाकीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: February 26, 2016 02:33 IST

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो.

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : हजारो लिटर पाण्याच्या अपव्ययामुळे गावावर पाणी टंचाईचे सावटवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो. या आराखड्यानुसार निधी खर्च होतो. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावात पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. यामुळे पाणी टंचाई निवारण्याच्या शासनाच्या प्रयत्नांवरच पाणी फेरल्या जात आहे. असाच प्रकार वायगाव (निपाणी) येथे उघड झाला आहे.वायगाव येथे जीवन प्राधिकरणाची नळ योजना आहे. या नळांना पाणी पुरविण्याकरिता गावात असलेल्या टाकीतून केवळ कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. या दिवसात पाण्याचा असा अपव्यय होत राहिल्यास गावकऱ्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकरता येत नाही. कधी ग्रामपंचायतीकडे असलेली येथील नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या योजनेमार्फत यशवंत विद्यालयाच्या परिसरात पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली. ही टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर यातील पाणी यशवंत विद्यालयातील विहिरीत पाईपाने जाते. ही विहीर पाण्याने भरल्यानंतरही पाण्याचा पुरवठा बंद केल्या जात नाही. यामुळे विहिरीतील पाणी रस्त्याने वाहते. याला केवळ येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आळशीपणा कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब एका दिवसाची नसून आता नित्याचीच झाली आहे. गावातील नळांना दोन दिवसाआड पाणी येते. वायगाव (नि.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने पिपरी (मेघे) येथून पाईप लाईन टाकली आहे. प्रत्येकाच्या नळाला या विभागामार्फत मिटर दिले आहे. यामुळे नळाच्या पाणी वापरामुळे येणारे देयकासह दुर्लक्षितपणामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे देयकही ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याची ओरड होत आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईची झळ पोहोचू नये म्हणून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)