शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजनेच्या टाकीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: February 26, 2016 02:33 IST

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो.

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : हजारो लिटर पाण्याच्या अपव्ययामुळे गावावर पाणी टंचाईचे सावटवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो. या आराखड्यानुसार निधी खर्च होतो. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावात पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. यामुळे पाणी टंचाई निवारण्याच्या शासनाच्या प्रयत्नांवरच पाणी फेरल्या जात आहे. असाच प्रकार वायगाव (निपाणी) येथे उघड झाला आहे.वायगाव येथे जीवन प्राधिकरणाची नळ योजना आहे. या नळांना पाणी पुरविण्याकरिता गावात असलेल्या टाकीतून केवळ कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. या दिवसात पाण्याचा असा अपव्यय होत राहिल्यास गावकऱ्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकरता येत नाही. कधी ग्रामपंचायतीकडे असलेली येथील नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या योजनेमार्फत यशवंत विद्यालयाच्या परिसरात पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली. ही टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर यातील पाणी यशवंत विद्यालयातील विहिरीत पाईपाने जाते. ही विहीर पाण्याने भरल्यानंतरही पाण्याचा पुरवठा बंद केल्या जात नाही. यामुळे विहिरीतील पाणी रस्त्याने वाहते. याला केवळ येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आळशीपणा कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब एका दिवसाची नसून आता नित्याचीच झाली आहे. गावातील नळांना दोन दिवसाआड पाणी येते. वायगाव (नि.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने पिपरी (मेघे) येथून पाईप लाईन टाकली आहे. प्रत्येकाच्या नळाला या विभागामार्फत मिटर दिले आहे. यामुळे नळाच्या पाणी वापरामुळे येणारे देयकासह दुर्लक्षितपणामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे देयकही ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याची ओरड होत आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईची झळ पोहोचू नये म्हणून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)