शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जलसंकट असतानाही पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई सुद्धा वाढत आहे, असे असतानाही कारंजा शहरात, काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यावरून वाहताहेत पाण्याचे पाटकारंजा (घा.) : वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई सुद्धा वाढत आहे, असे असतानाही कारंजा शहरात, काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगर पंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.शहरातील गोळीबार चौकाच्या पलिकडे दाभा रस्त्यावर सतत पाण्याचे डबके साचलेले असतात. या परिसरात विठ्ठल मंदिराच्या टेकडीवर पाणी पुरवठ्याची टाकी आहे. ही टाकी बरेचदा पाण्याने पूर्ण भरून ओव्हर फ्लो होते. पण ती बंद केली जात नाही. पाण्याचा प्रवाह बंद करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नेहमीच याकडे दुर्लक्ष होते. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहात चौकात जमा होते. वाहतुकीस यामुळे अडथळा होतो. तसेच अपघाताची शक्यताही यामुळे बळावली आहे. गावात जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीच्या घरातील कुपनलिकेचे पाणी सतत वाहत असते. रस्त्याच्या बाजुला नाली नसल्यामुळे ते पाणी रस्त्यावर पसरते. कारंजात दर एक दिवसाआड नळाला पाणी येते. काही भागात सदोष यंत्रणेमुळे पाणी पोहचत नाही. पाणी योजनेची विहीर ज्या खैरी धरणावर आहे त्या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत असतानाही पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)