शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात दोन बालकांना जलसमाधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:30 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला.

रोहणा (वर्धा) :  निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला. ही घटना गुरुवारी रात्री उघड झाली. रितीक अविनाश राऊत (१५) व मयुर विजय पारिसे (१४) रा. मारडा असे बुडून मृत्यू झालेल्या बालकांची नावे असल्याची माहिती आहे. 

पोलीस सुत्रांनुसार, मारडा येथील रितीक राऊत व मयुर पारीसे हे दोघे सायकल धुण्यासाठी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याकडे  सायंकाळी गेले होते. सायंकाळचे सात वाजले तरी दोघेही घरी परतले नसल्याने आई-वडिलांनी व गावकºयांनी शोधाशोध केली असता गावालगतच्या निम्न वर्धाच्या कालव्याच्या पुलाजवळ मुलांच्या सायकली व चपला दिसल्या. याची माहिती मनोज ज्ञानेश्वर राऊत यांनी पुलगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच हवालदार सूर्यवंशी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

रात्री कालव्यात गावातील पोहण्यात तरबेज असलेल्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला. यात दोन्ही मुलांचे मृतदेह मिळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृदतदेह पुलगाव येथील शवविच्छेदनगृहात पाढविण्यात आले. 

दोन्ही मुले मॉडेल हायस्कूल रोहणाचे विद्यार्थी असून रितीक हा वर्ग नववी तर मयुर हा वर्ग आठवीमध्ये शिकत होता. रखरखत्या उन्हामुळे वर्धा नदी व कालवा कोरडा होता पण पाणी टंचाईची तिव्रता कमी व्हावी म्हणून नुकतेच निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वर्धा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडण्यात आले होते. तपास पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुरांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.