शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कालव्यात दोन बालकांना जलसमाधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:30 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला.

रोहणा (वर्धा) :  निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला. ही घटना गुरुवारी रात्री उघड झाली. रितीक अविनाश राऊत (१५) व मयुर विजय पारिसे (१४) रा. मारडा असे बुडून मृत्यू झालेल्या बालकांची नावे असल्याची माहिती आहे. 

पोलीस सुत्रांनुसार, मारडा येथील रितीक राऊत व मयुर पारीसे हे दोघे सायकल धुण्यासाठी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याकडे  सायंकाळी गेले होते. सायंकाळचे सात वाजले तरी दोघेही घरी परतले नसल्याने आई-वडिलांनी व गावकºयांनी शोधाशोध केली असता गावालगतच्या निम्न वर्धाच्या कालव्याच्या पुलाजवळ मुलांच्या सायकली व चपला दिसल्या. याची माहिती मनोज ज्ञानेश्वर राऊत यांनी पुलगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच हवालदार सूर्यवंशी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

रात्री कालव्यात गावातील पोहण्यात तरबेज असलेल्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला. यात दोन्ही मुलांचे मृतदेह मिळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृदतदेह पुलगाव येथील शवविच्छेदनगृहात पाढविण्यात आले. 

दोन्ही मुले मॉडेल हायस्कूल रोहणाचे विद्यार्थी असून रितीक हा वर्ग नववी तर मयुर हा वर्ग आठवीमध्ये शिकत होता. रखरखत्या उन्हामुळे वर्धा नदी व कालवा कोरडा होता पण पाणी टंचाईची तिव्रता कमी व्हावी म्हणून नुकतेच निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वर्धा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडण्यात आले होते. तपास पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुरांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.