शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

टँकरद्वारे पाणी पुरवठा नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:52 IST

शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देग्रा.पं. चा पुढाकार : प्रति कुटुंबाला मिळते दोन ड्रम पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.पिपरी (मेघे) ग्रामपंचायतला जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. जलाशयाने तळ गाठल्यामुळे नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने काही भागात सहाव्या दिवशी तर काही भागात दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी व कुपननिकांही कोरड्याठाक झाल्याने काही भागात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु आहे. आगामी समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली होती. पण, प्रशासनाने टँकर उपलब्ध करुन न दिल्याने शेवटी ग्रामपंचायतनेच लोकसहभागातून तीन टँकर मिळवून पाणी समस्येवर मात केली आहे. दररोज आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. सोमवारी सकाळपासून सावजीनगर, पेंदाम ले-आऊट, गांजरे ले-आऊट व मालेकर ले-आऊट या परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. प्रत्येक कुटूंबाला दोन ड्रम पाणी पुरविले जात आहे. कमी पाणी मिळत असले तरीही नागरिकांचा त्रास वाचल्याचे सांगितले जात आहे.यांनी दिला सहकार्याचा हातग्रामपंचायत पिपरी (मेघे) परिसरातील भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून १२ हजार लिटर क्षमतेचा १ टँकर भेट देण्यात आला.पण, एका टँकरने ही समस्या निकाली निघणारी नसल्यामुळे आमदार डॉ.पंकज भोयर मित्र परिवार आणि सरपंच अजय गौळकर मित्र परिवाराच्यावतीने ५ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या तिन्ही टँकरच्या सहाय्याने सध्या पाणी पुरवठा सुरु आहे.गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. आता पाण्यासाठी नागरिकांची होणारी पायपीट पाहून ग्रामपंचायत प्रशासनाने लोकसहभागातून समस्या निकाली काढण्याचा ठराव घेतला. त्यानुसार तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. प्रति कुटूंबाला दोन ड्रम पाणी यानुसार पाणीपुरवठा सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.-अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे).