शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:11 IST

शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपुरवठा सुरळीत करण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.सध्या पाणी टंचाईमुळे अनियमित झालेला पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने लोअर वर्धा धरणाकडे १५ लाख रूपये जमा केल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले. नागरिकांनी पाणीटंचाई लक्षात सहकार्य केल्यास पूर्ववत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही नगराध्यक्ष शीतल गाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहर व परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता शेकडो कोटी रूपये खर्चाचे पुलगाव बॅरेज बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ठराविक मुदतीत बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. भीषण पाणीटंचाईच्या काळात शहराला पाणीपुरवठा करणाºया हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, आठवडी बाजार यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था व काही ठिकाणच्या मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे.पूर्वी पाणीटंचाई नागरिक शहरातील मोठ्या विहिरींच्या पाण्याचा वापर करीत होते. परंतु, आज त्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहरात नळयोजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. परिणामी मागील काही दिवसात चार-पाच दिवसांआड पाणी पुरवठा सुरू होता. नगर प्रशासनाने लोअर वर्धा प्रशासनाकडे १५ लाख रूपये भरल्यामुळे लोअर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आले असून शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. याशिवाय पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात विविध वॉर्डात ३४ बोअरवेल करण्यात आल्या असून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष गाते यांनी केले आहे.नदीपात्राला कोरडयंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने शहरालगत वाहणाºया वर्धा नदीपात्राला अनेक ठिकाणी कोरड पडली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन-चार दिवसांवर आला. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई