शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:11 IST

शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपुरवठा सुरळीत करण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.सध्या पाणी टंचाईमुळे अनियमित झालेला पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने लोअर वर्धा धरणाकडे १५ लाख रूपये जमा केल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले. नागरिकांनी पाणीटंचाई लक्षात सहकार्य केल्यास पूर्ववत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही नगराध्यक्ष शीतल गाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहर व परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता शेकडो कोटी रूपये खर्चाचे पुलगाव बॅरेज बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ठराविक मुदतीत बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. भीषण पाणीटंचाईच्या काळात शहराला पाणीपुरवठा करणाºया हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, आठवडी बाजार यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था व काही ठिकाणच्या मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे.पूर्वी पाणीटंचाई नागरिक शहरातील मोठ्या विहिरींच्या पाण्याचा वापर करीत होते. परंतु, आज त्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहरात नळयोजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. परिणामी मागील काही दिवसात चार-पाच दिवसांआड पाणी पुरवठा सुरू होता. नगर प्रशासनाने लोअर वर्धा प्रशासनाकडे १५ लाख रूपये भरल्यामुळे लोअर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आले असून शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. याशिवाय पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात विविध वॉर्डात ३४ बोअरवेल करण्यात आल्या असून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष गाते यांनी केले आहे.नदीपात्राला कोरडयंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने शहरालगत वाहणाºया वर्धा नदीपात्राला अनेक ठिकाणी कोरड पडली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन-चार दिवसांवर आला. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई