शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे सावट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:51 IST

उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

ठळक मुद्देआराखड्यात ७०९ गावे : पंचाळा गावात तीव्रता अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवारमुळे टंचाईची तीव्रता जाणवत नसली तरी अनेक गावांत पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांत पाणीटंचाई निर्माण होईल, असा आराखडा तयार केला होता. यात काय उपाययोजना करणार, हे देखील निश्चित करण्यात आले होते. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरींचे खोलीकरण, विंधन विहिरी यासह जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यामुळे यंदा फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी काही गावांत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथेच काही भागात पाणी पोहोचत नसल्याने टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिसते.१५ दिवसांपासून नेरी पुनर्वसनचा पाणीपुरवठा ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेरी गावाचे सालोड येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील १५ दिवसांपासून बंद आहे. योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.नेरी पुनर्वसन हे वॉर्ड क्र. १ व २ अशा दोन भागात वसलेले आहे. वॉर्ड क्र. दोनचा काही भाग टेकडीवर आहे. यामुळे हातपंपालाही पाणी कमी येते. धोत्रा रोडवरील विहिरीवरून येणारे पाणी क्षारयुक्त व दूषित असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत नेरी पुनर्वसन येथील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करून देण्यात यावी. जीवन प्राधिकरणद्वारे तथा शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या बंद असलेली पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही जिल्हा प्रशासनाला तक्रारीतून दिला आहे. यावेळी जयश्री दारोडकर, श्रीकृष्णा टोकसे, सुखदेव मिरगे, सरला बन्सोड, बन्सोड आदी उपस्थित होते.खळ्यावर मांडला ठिय्यागुरांचे कळप एका गावातून दुसºया गावात हलविण्याचे प्रयत्न शेतकरी व गवळी करीत आहे. मुबलक पाणी व शेती असलेल्या शेतकºयांच्या शेतात खळे तयार करुन तेथे ठिय्या मांडला आहे.