शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

पाणीटंचाईचे सावट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:51 IST

उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

ठळक मुद्देआराखड्यात ७०९ गावे : पंचाळा गावात तीव्रता अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवारमुळे टंचाईची तीव्रता जाणवत नसली तरी अनेक गावांत पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांत पाणीटंचाई निर्माण होईल, असा आराखडा तयार केला होता. यात काय उपाययोजना करणार, हे देखील निश्चित करण्यात आले होते. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरींचे खोलीकरण, विंधन विहिरी यासह जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यामुळे यंदा फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी काही गावांत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथेच काही भागात पाणी पोहोचत नसल्याने टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिसते.१५ दिवसांपासून नेरी पुनर्वसनचा पाणीपुरवठा ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेरी गावाचे सालोड येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील १५ दिवसांपासून बंद आहे. योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.नेरी पुनर्वसन हे वॉर्ड क्र. १ व २ अशा दोन भागात वसलेले आहे. वॉर्ड क्र. दोनचा काही भाग टेकडीवर आहे. यामुळे हातपंपालाही पाणी कमी येते. धोत्रा रोडवरील विहिरीवरून येणारे पाणी क्षारयुक्त व दूषित असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत नेरी पुनर्वसन येथील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करून देण्यात यावी. जीवन प्राधिकरणद्वारे तथा शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या बंद असलेली पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही जिल्हा प्रशासनाला तक्रारीतून दिला आहे. यावेळी जयश्री दारोडकर, श्रीकृष्णा टोकसे, सुखदेव मिरगे, सरला बन्सोड, बन्सोड आदी उपस्थित होते.खळ्यावर मांडला ठिय्यागुरांचे कळप एका गावातून दुसºया गावात हलविण्याचे प्रयत्न शेतकरी व गवळी करीत आहे. मुबलक पाणी व शेती असलेल्या शेतकºयांच्या शेतात खळे तयार करुन तेथे ठिय्या मांडला आहे.