शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पाणीटंचाईचे सावट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:51 IST

उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

ठळक मुद्देआराखड्यात ७०९ गावे : पंचाळा गावात तीव्रता अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवारमुळे टंचाईची तीव्रता जाणवत नसली तरी अनेक गावांत पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांत पाणीटंचाई निर्माण होईल, असा आराखडा तयार केला होता. यात काय उपाययोजना करणार, हे देखील निश्चित करण्यात आले होते. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. विहिरींचे खोलीकरण, विंधन विहिरी यासह जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यामुळे यंदा फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी काही गावांत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथेच काही भागात पाणी पोहोचत नसल्याने टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिसते.१५ दिवसांपासून नेरी पुनर्वसनचा पाणीपुरवठा ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेरी गावाचे सालोड येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील १५ दिवसांपासून बंद आहे. योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.नेरी पुनर्वसन हे वॉर्ड क्र. १ व २ अशा दोन भागात वसलेले आहे. वॉर्ड क्र. दोनचा काही भाग टेकडीवर आहे. यामुळे हातपंपालाही पाणी कमी येते. धोत्रा रोडवरील विहिरीवरून येणारे पाणी क्षारयुक्त व दूषित असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत नेरी पुनर्वसन येथील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करून देण्यात यावी. जीवन प्राधिकरणद्वारे तथा शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या बंद असलेली पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही जिल्हा प्रशासनाला तक्रारीतून दिला आहे. यावेळी जयश्री दारोडकर, श्रीकृष्णा टोकसे, सुखदेव मिरगे, सरला बन्सोड, बन्सोड आदी उपस्थित होते.खळ्यावर मांडला ठिय्यागुरांचे कळप एका गावातून दुसºया गावात हलविण्याचे प्रयत्न शेतकरी व गवळी करीत आहे. मुबलक पाणी व शेती असलेल्या शेतकºयांच्या शेतात खळे तयार करुन तेथे ठिय्या मांडला आहे.