शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

अवैध नळ जोडण्यांमुळे पाणी टंचाई

By admin | Updated: March 26, 2015 01:44 IST

येथील साईनगर परिसरात जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने पाणी पुरवठा केल्या जातो.

आर्वी : येथील साईनगर परिसरात जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने पाणी पुरवठा केल्या जातो. या भागात अनेकांनी अवैधरित्या नळजोडण्या केल्या असून मोटर लावून पाणी ओढले जाते. यामुळे पाणी टंचाई सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे या भागातील अवैध नळ जोडण्यांचा शोध घेत त्यावर कारवाईची मागणी जीवन प्राधिकरणला निवेदनातून केली आहे. साईनगर येथील काही बांधकामावर प्राधिकरण विभागाच्या पाणीपुरवठा विभागाचे पाईपलाईनवरून अवैध नळकनेक्शन घेतले आहे. नळकनेक्शनला मोटार लावून मोठ्या प्रमाणावर पाणी ओढल्या जात आहे. त्यामुळे या भागातील इतर नागरिकांना पाणीपुरवठा अत्यंत कमी होतो. प्राधिकरणने प्रत्येक नळधारकास एक मिटर देण्याचे नियमात असताना विनामिटर दोन नळकनेक्शन दिल्याचा आरोप होत आहे. या अवैध नळकनेक्शनवर एक हॉर्स पॉवरची मोटर बसवून पाणीओढल्या जाते. याबाबतची माहिती संबंधितांना देऊनही कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. अवैध नळजोडण्यांना त्वरित आवर घालत त्यावरील मोटरी बंद कराव्या अशी मागणी विष्णू आहुजा, अशोक भट्टडसह यांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)देवळीतही विद्युत मोटारीने पाण्याची बिनदिक्कत चोरीदेवळी- येथील नगर परिषदेच्या नळांवर अनेकांनी वीज मोटारी सुरू केल्या आहेत. यामुळे काही भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. नागरिकांना पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे नळांवरील मोटारी काढण्याची मागणी पंकज तडस व नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील काही लोकांनी पालिकेच्या पाईपलाईनवर असलेल्या नळांवर मोटर पंप बसवलेले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाण्याचा पुरवठा होत नाही. नळ योजना असून सुद्धा उन्हाळ्यात नागरिकांना दुरवरून हातपंपावरून, विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. या बाबत नगरपरिषद कार्यालयात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला कोणाच्या घरी मोटरपंप लावले आहे हे माहिती असतानाही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नळावर मोटारपंप लावणाऱ्यांवर धाडसत्र राबवून पंप लावणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करून त्याचा पंप जप्त करण्याची कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. पाणी पट्टी कर वसूल करताना जी सक्ती करण्यात येते तीच सक्ती पंप काढण्याकरिता करावी, असे निवेदनात नमूद आहे.(प्रतिनिधी)