शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

‘मातोश्री’वर पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:24 IST

शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.

ठळक मुद्देवृद्धांची आबाळ : आठ दिवसांपासून सुरू आहे फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये सिंदी (मेघे) परिसरातील मातृसेवा संघाच्या तीन एकर जागेवर मातोश्री वृद्धाश्रमाची इमारत उभारण्यात आली. वृद्धाश्रमाच्या निर्मितीपासून अडीच वर्षांपर्यंतच शासनाकडून अनुदान मिळाले. त्यानंतर बंद झालेले अनुदान अद्यापही मिळत नसल्याने देणगीदात्यांच्या भरोशावर आणि वृद्धांकडून मिळणाऱ्या रकमेतून वृद्धाश्रमाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्ली येथे १८ महिला व १३ पुरुष असे एकूण ३३ वृद्ध आश्रयाला आहेत. आतापर्यंत वृद्धाश्रमातील विहिरीत पाणी असल्याने कधीही पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र यावर्षी विहिरीचा गाळ उपसूनही पाणी नसल्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली. दिवस-रात्र येरझारा केल्या, पण पाणी मिळाले नाही. अखेर वृद्धांना जवळच्याच हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.मागील आठ दिवसांपासून पाण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या वृध्दाश्रमात पाणी पुरवठ्याकरिता मदतीचा हात पुढे करण्याची गरज व्यक्त होत आहे.माणुसकीला फुटला पाझरवृद्धाश्रमातील नागरिकांची ही अवस्था पाहून व्यवस्थापनाने दानदात्यांकडे पाण्याची मागणी केली. त्यामुळे लगेच अनिल परियाल यांनी पाण्याचा टँकर पाठवून त्यांना भोजनदानही दिले. या पाण्याने वृद्धाश्रमातील दोन हजार लिटरच्या दोन मोठ्या टाक्या भरून ठेवल्या आहेत. एक दिवसाआड पुन्हा पाण्याची गरज असल्याने आता कोण टँकर देणार? याचा विचार वृद्ध करीत आहेत. वृद्धाश्रमालगतचा फलके आणि तिळले परिवार नियमित या वृद्धांना पिण्याचे पाणी पुरवित असल्याने त्यांची तहान भागत आहे.मुलं गारव्यात अन् जन्मदाते उकाड्यातया वृद्धाश्रमात नागपूर जिल्ह्यातील दोन व्यक्ती वगळल्या तर उर्वरित वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी आहे. काहींची मुले गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवरून टुमदार बंगल्यात गार हवा घेत आहे. विशेषत: अनेकांची घरेही याच वृद्ध मायबापांनी उभी करुन दिली. पण, त्यांना उकाड्यात दिवस काढणाºया जन्मदात्यांची कदर येत नाही. एक वृद्ध आजारी असून व्यवस्थापनाने मुलांना कळविले. पण, मुलांचे पाऊल अद्याप वृद्धाश्रमात वडिलांकडे वळले नाही.वृद्धाश्रमात सध्या ३३ वृद्ध सदस्य असून मातृसेवा संघाद्वारे त्यांची शुश्रुशा केली जात आहे. वृद्धांकडून मिळणारी महिनेवारी राशी आणि दानदात्यांकडून मिळणारी मदत याच्या भरवशावरच सेवाकार्य सुरुआहे. मागील आठ दिवसांपासून विहिरी आटल्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे मागणी केली पण, पाणी मिळाले नाही. परियाल यांनी एक टँकर पाणी दिले. आता पुन्हा पाण्याची गरज आहे.-सुरेश परसोडकर, व्यवस्थापक.