शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

‘मातोश्री’वर पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:24 IST

शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.

ठळक मुद्देवृद्धांची आबाळ : आठ दिवसांपासून सुरू आहे फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये सिंदी (मेघे) परिसरातील मातृसेवा संघाच्या तीन एकर जागेवर मातोश्री वृद्धाश्रमाची इमारत उभारण्यात आली. वृद्धाश्रमाच्या निर्मितीपासून अडीच वर्षांपर्यंतच शासनाकडून अनुदान मिळाले. त्यानंतर बंद झालेले अनुदान अद्यापही मिळत नसल्याने देणगीदात्यांच्या भरोशावर आणि वृद्धांकडून मिळणाऱ्या रकमेतून वृद्धाश्रमाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्ली येथे १८ महिला व १३ पुरुष असे एकूण ३३ वृद्ध आश्रयाला आहेत. आतापर्यंत वृद्धाश्रमातील विहिरीत पाणी असल्याने कधीही पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र यावर्षी विहिरीचा गाळ उपसूनही पाणी नसल्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली. दिवस-रात्र येरझारा केल्या, पण पाणी मिळाले नाही. अखेर वृद्धांना जवळच्याच हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.मागील आठ दिवसांपासून पाण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या वृध्दाश्रमात पाणी पुरवठ्याकरिता मदतीचा हात पुढे करण्याची गरज व्यक्त होत आहे.माणुसकीला फुटला पाझरवृद्धाश्रमातील नागरिकांची ही अवस्था पाहून व्यवस्थापनाने दानदात्यांकडे पाण्याची मागणी केली. त्यामुळे लगेच अनिल परियाल यांनी पाण्याचा टँकर पाठवून त्यांना भोजनदानही दिले. या पाण्याने वृद्धाश्रमातील दोन हजार लिटरच्या दोन मोठ्या टाक्या भरून ठेवल्या आहेत. एक दिवसाआड पुन्हा पाण्याची गरज असल्याने आता कोण टँकर देणार? याचा विचार वृद्ध करीत आहेत. वृद्धाश्रमालगतचा फलके आणि तिळले परिवार नियमित या वृद्धांना पिण्याचे पाणी पुरवित असल्याने त्यांची तहान भागत आहे.मुलं गारव्यात अन् जन्मदाते उकाड्यातया वृद्धाश्रमात नागपूर जिल्ह्यातील दोन व्यक्ती वगळल्या तर उर्वरित वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी आहे. काहींची मुले गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवरून टुमदार बंगल्यात गार हवा घेत आहे. विशेषत: अनेकांची घरेही याच वृद्ध मायबापांनी उभी करुन दिली. पण, त्यांना उकाड्यात दिवस काढणाºया जन्मदात्यांची कदर येत नाही. एक वृद्ध आजारी असून व्यवस्थापनाने मुलांना कळविले. पण, मुलांचे पाऊल अद्याप वृद्धाश्रमात वडिलांकडे वळले नाही.वृद्धाश्रमात सध्या ३३ वृद्ध सदस्य असून मातृसेवा संघाद्वारे त्यांची शुश्रुशा केली जात आहे. वृद्धांकडून मिळणारी महिनेवारी राशी आणि दानदात्यांकडून मिळणारी मदत याच्या भरवशावरच सेवाकार्य सुरुआहे. मागील आठ दिवसांपासून विहिरी आटल्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे मागणी केली पण, पाणी मिळाले नाही. परियाल यांनी एक टँकर पाणी दिले. आता पुन्हा पाण्याची गरज आहे.-सुरेश परसोडकर, व्यवस्थापक.