शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’वर पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:24 IST

शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.

ठळक मुद्देवृद्धांची आबाळ : आठ दिवसांपासून सुरू आहे फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असून त्याच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागत आहे. सध्या सिंदी (मेघे) परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमातही मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याने वृद्धांची पाण्यासाठी फरपट सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली पण, ग्रामपंचायतीने नकारघंटा चालविल्याने शेवटी दानदात्यांकडे हात पसरावे लागत आहेत.भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सरकारच्या काळात १९९७ मध्ये सिंदी (मेघे) परिसरातील मातृसेवा संघाच्या तीन एकर जागेवर मातोश्री वृद्धाश्रमाची इमारत उभारण्यात आली. वृद्धाश्रमाच्या निर्मितीपासून अडीच वर्षांपर्यंतच शासनाकडून अनुदान मिळाले. त्यानंतर बंद झालेले अनुदान अद्यापही मिळत नसल्याने देणगीदात्यांच्या भरोशावर आणि वृद्धांकडून मिळणाऱ्या रकमेतून वृद्धाश्रमाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्ली येथे १८ महिला व १३ पुरुष असे एकूण ३३ वृद्ध आश्रयाला आहेत. आतापर्यंत वृद्धाश्रमातील विहिरीत पाणी असल्याने कधीही पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र यावर्षी विहिरीचा गाळ उपसूनही पाणी नसल्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी केली. दिवस-रात्र येरझारा केल्या, पण पाणी मिळाले नाही. अखेर वृद्धांना जवळच्याच हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.मागील आठ दिवसांपासून पाण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या वृध्दाश्रमात पाणी पुरवठ्याकरिता मदतीचा हात पुढे करण्याची गरज व्यक्त होत आहे.माणुसकीला फुटला पाझरवृद्धाश्रमातील नागरिकांची ही अवस्था पाहून व्यवस्थापनाने दानदात्यांकडे पाण्याची मागणी केली. त्यामुळे लगेच अनिल परियाल यांनी पाण्याचा टँकर पाठवून त्यांना भोजनदानही दिले. या पाण्याने वृद्धाश्रमातील दोन हजार लिटरच्या दोन मोठ्या टाक्या भरून ठेवल्या आहेत. एक दिवसाआड पुन्हा पाण्याची गरज असल्याने आता कोण टँकर देणार? याचा विचार वृद्ध करीत आहेत. वृद्धाश्रमालगतचा फलके आणि तिळले परिवार नियमित या वृद्धांना पिण्याचे पाणी पुरवित असल्याने त्यांची तहान भागत आहे.मुलं गारव्यात अन् जन्मदाते उकाड्यातया वृद्धाश्रमात नागपूर जिल्ह्यातील दोन व्यक्ती वगळल्या तर उर्वरित वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी आहे. काहींची मुले गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवरून टुमदार बंगल्यात गार हवा घेत आहे. विशेषत: अनेकांची घरेही याच वृद्ध मायबापांनी उभी करुन दिली. पण, त्यांना उकाड्यात दिवस काढणाºया जन्मदात्यांची कदर येत नाही. एक वृद्ध आजारी असून व्यवस्थापनाने मुलांना कळविले. पण, मुलांचे पाऊल अद्याप वृद्धाश्रमात वडिलांकडे वळले नाही.वृद्धाश्रमात सध्या ३३ वृद्ध सदस्य असून मातृसेवा संघाद्वारे त्यांची शुश्रुशा केली जात आहे. वृद्धांकडून मिळणारी महिनेवारी राशी आणि दानदात्यांकडून मिळणारी मदत याच्या भरवशावरच सेवाकार्य सुरुआहे. मागील आठ दिवसांपासून विहिरी आटल्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे मागणी केली पण, पाणी मिळाले नाही. परियाल यांनी एक टँकर पाणी दिले. आता पुन्हा पाण्याची गरज आहे.-सुरेश परसोडकर, व्यवस्थापक.