शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:06 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : देखभाल दुरूस्तीकडे होताहेत दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.शहरातील पोस्ट आॅफीस चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यतच्या मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत सर्व विभागातील शासकीय कर्मचारी वास्तव्यास आहे. या इमारतील वास्तव्यापोटी कर्मचाºयांच्या वेतनातून निवास भाडेही कपात केले जाते.परंतू बांधकाम विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर तीन दिवसांपासून जळालेली असल्याने कर्मचाºयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा ही मोटर जळाल्याने येथील नागरिकांना पाणीबाणी सहन करावी लागली. त्यामुळे याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता बांधकाम विभागाच्या विद्यूत विभागाकडे बोट दाखविले जाते. मोटर जळली की तीच दुरुस्त करुन लावली जाते.पण, नवीन मोटर लावून ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढली जात नाही. निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे करुन बांधकाम विभाग हात वर करीत आहे. शासकीय कर्मचाºयांच्याच वाटेला हे दुखन असतांना तेथे सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती होईल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.गवताने वेढलेल्या कुपननलीकेचा आधारसार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याची समस्या निर्माण झाली तर कुपनलीकाचा आधार व्हावा, म्हणून कुपनलीका बसविण्यात आली.परंतू याकडेही दुर्लक्ष असल्याने कुपनलीकेच्या सभोवताली गवताचा वेढा आहे. येथील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील महिला, पुरुष व चिमुकल्यांना रात्री अंधारात याच कुपनलीकेवरुन पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे वसाहतीतील नारिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.