शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:06 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : देखभाल दुरूस्तीकडे होताहेत दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.शहरातील पोस्ट आॅफीस चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यतच्या मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत सर्व विभागातील शासकीय कर्मचारी वास्तव्यास आहे. या इमारतील वास्तव्यापोटी कर्मचाºयांच्या वेतनातून निवास भाडेही कपात केले जाते.परंतू बांधकाम विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर तीन दिवसांपासून जळालेली असल्याने कर्मचाºयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा ही मोटर जळाल्याने येथील नागरिकांना पाणीबाणी सहन करावी लागली. त्यामुळे याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता बांधकाम विभागाच्या विद्यूत विभागाकडे बोट दाखविले जाते. मोटर जळली की तीच दुरुस्त करुन लावली जाते.पण, नवीन मोटर लावून ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढली जात नाही. निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे करुन बांधकाम विभाग हात वर करीत आहे. शासकीय कर्मचाºयांच्याच वाटेला हे दुखन असतांना तेथे सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती होईल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.गवताने वेढलेल्या कुपननलीकेचा आधारसार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याची समस्या निर्माण झाली तर कुपनलीकाचा आधार व्हावा, म्हणून कुपनलीका बसविण्यात आली.परंतू याकडेही दुर्लक्ष असल्याने कुपनलीकेच्या सभोवताली गवताचा वेढा आहे. येथील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील महिला, पुरुष व चिमुकल्यांना रात्री अंधारात याच कुपनलीकेवरुन पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे वसाहतीतील नारिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.