शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

बोरधरणातून सोडलेले पाणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्यवितरीका व छोट्या वितरीकांची साफसफाई करणे गरजेचे असते.

ठळक मुद्देसेलूच्या पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : बोरधरणाचे पाणी वितरकांव्दारे शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवून परिसरात हरित क्रांती व्हावी म्हणून त्या काळात बोर नदीवर धरण बांधण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या कामचुकार व नियोजन शून्य कारभारामुळे या वितरका ठिकठिकाणी फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेताची आणि पिकाची सद्या वाट लागत असल्याचे दिसून येत आहे.सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्यवितरीका व छोट्या वितरीकांची साफसफाई करणे गरजेचे असते. पण तसे झालेले नाही. त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून नाल्या, नहर, साफ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच वितरीकांना नुकसान पोहचविल्याचा दम देवून कारवाई करण्याचा धाक दाखविल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्य कालवे वितरीका साफ न केल्याने व शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वितरीकेत पाणी सोडल्यावर त्या जेसीबीच्या सहाय्याने साफ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कोटंबा येथील रविंद्र देवतळे व विठ्ठल गजानन वाघमारे यांच्या शेताची पार वाट लावली आहे. या ठिकाणी काही अंतर सिमेंट काँक्रीटची वितरीका तर उर्वरीत मातीची आहे. संबधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिमेंटने बांधून असलेल्या वितरिकेपेक्षा मातीचे खोदकाम असलेली वितरीका जास्त खोदल्याने पाणी वाहून न जात वितरीकेत मोठ्या प्रमाणात साचते. त्यामुळे जास्त प्रवाहामुळे ती फुटल्याने पूर्ण पाणी शेतातून वाहते. या वितरीकेचे सिमेंटचे बांधकाम अनेक ठिकाणी फुटून पाण्याने मार्ग काढला आहे.पांदण रस्त्याचा झाला नालाकोटंबा वितरीकेसह इतरही ठिकाणी शेतातील पाणी रस्त्यावर येवूनपांदण रस्ते खराब झाले आहे. पिकांच्या सिंचनासाठी धरणाचे पाणी सोडण्यात आले खरे; पण ते सिंचनापेक्षा वायाच जास्त जाते. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यत पाणी पोहचत नाही. सर्व वितरकांची सफाई व डागडूजी करण्याची गरज असून तशी मागणी आहे.मी अत्यंत गरीब शेतकरी आहे. पाण्याच्या प्रवाहाने ती फुटली. शिवाय कपाशी आणि चणा पीक खराब होत आहे. शेतात पाणी शिरल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.- विठ्ठल वाघमारे, शेतकरी.माझ्या शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेल्या नालीतून नहराच्या पाण्याचा मोठा प्रवाह गेल्याने माझे शेत खचले आहे. आता मला सिमेंट काँक्रीटची नालीच बांधावी लागणार आहे. हा खर्च करण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे.- रविंद्र देवतळे, शेतकरी.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पBor Damबोर धरण