शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
2
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
3
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
4
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
5
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
6
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
7
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
8
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
9
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
10
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
11
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
12
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
13
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
14
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
15
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
16
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
17
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
18
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
19
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
20
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद

भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:17 IST

शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते.

ठळक मुद्देरामदास तडस : निवडणूक विभागाला विनंती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. परंतु, त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. शिवाय सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पाणी समस्येचा विषय आचार संहितेतून वगळावा अशी विनंती आपण निवडणूक विभागाकडे करणार असल्याचे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले आहे.वर्धा शहराला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पिण्याची उचल करून त्याच पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना केल्या जातो. हा पुरवठा होत असताना महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत संपूर्ण पाणी नदीपात्रातून मार्गक्रमण करते. २६ ते ३० किमी नदी पात्रातून पाणी मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हेच बाष्पीभवन टाळण्यासाठी तसेच वर्धा शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीला नविन तंत्रज्ञानाची जोड देऊन भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणल्यास भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल.महाकाली धाम प्रकल्पातून वर्धा न.प. ला ५.७९ दलघमी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ४.१८ दलघमी, मध्ये रेल्वे विभागाला १ दलघमी, एमआयडीसीसाठी २.४० दलघमी इतका पाणीसाठा आरक्षीत ठेवण्यात आला आहे. महाकाली धाम प्रकल्पाचे एकूण क्षमता ३२८.६०० दलघमी असून सध्या अतिशय अल्प उपयुक्त जलसाठा या जलाशयात शिल्लक आहे.पर्जन्यमान दरवर्षी बदलत असते कधी जास्त तर कधी कमी राहते. भविष्यात भूमिगत जलवाहिनीद्वारे धाम प्रकल्प ते येळाकेळीपर्यंत कायम स्वरूपी पाणी आणल्यास पाण्याचीही बचत होणार आहे. याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज असल्याचे तसेच जिल्हा प्रशासनानेही याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने गांभीर्याने विचार करावावर्धा शहरातील व परिसरातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याविषयी प्रशासनानेही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे खा. तडस यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस