शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:17 IST

शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते.

ठळक मुद्देरामदास तडस : निवडणूक विभागाला विनंती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. परंतु, त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. शिवाय सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पाणी समस्येचा विषय आचार संहितेतून वगळावा अशी विनंती आपण निवडणूक विभागाकडे करणार असल्याचे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले आहे.वर्धा शहराला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पिण्याची उचल करून त्याच पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना केल्या जातो. हा पुरवठा होत असताना महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत संपूर्ण पाणी नदीपात्रातून मार्गक्रमण करते. २६ ते ३० किमी नदी पात्रातून पाणी मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हेच बाष्पीभवन टाळण्यासाठी तसेच वर्धा शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीला नविन तंत्रज्ञानाची जोड देऊन भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणल्यास भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल.महाकाली धाम प्रकल्पातून वर्धा न.प. ला ५.७९ दलघमी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ४.१८ दलघमी, मध्ये रेल्वे विभागाला १ दलघमी, एमआयडीसीसाठी २.४० दलघमी इतका पाणीसाठा आरक्षीत ठेवण्यात आला आहे. महाकाली धाम प्रकल्पाचे एकूण क्षमता ३२८.६०० दलघमी असून सध्या अतिशय अल्प उपयुक्त जलसाठा या जलाशयात शिल्लक आहे.पर्जन्यमान दरवर्षी बदलत असते कधी जास्त तर कधी कमी राहते. भविष्यात भूमिगत जलवाहिनीद्वारे धाम प्रकल्प ते येळाकेळीपर्यंत कायम स्वरूपी पाणी आणल्यास पाण्याचीही बचत होणार आहे. याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज असल्याचे तसेच जिल्हा प्रशासनानेही याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने गांभीर्याने विचार करावावर्धा शहरातील व परिसरातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याविषयी प्रशासनानेही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे खा. तडस यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस