शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:17 IST

शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते.

ठळक मुद्देरामदास तडस : निवडणूक विभागाला विनंती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. परंतु, त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. शिवाय सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पाणी समस्येचा विषय आचार संहितेतून वगळावा अशी विनंती आपण निवडणूक विभागाकडे करणार असल्याचे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले आहे.वर्धा शहराला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पिण्याची उचल करून त्याच पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना केल्या जातो. हा पुरवठा होत असताना महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत संपूर्ण पाणी नदीपात्रातून मार्गक्रमण करते. २६ ते ३० किमी नदी पात्रातून पाणी मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हेच बाष्पीभवन टाळण्यासाठी तसेच वर्धा शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीला नविन तंत्रज्ञानाची जोड देऊन भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणल्यास भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल.महाकाली धाम प्रकल्पातून वर्धा न.प. ला ५.७९ दलघमी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ४.१८ दलघमी, मध्ये रेल्वे विभागाला १ दलघमी, एमआयडीसीसाठी २.४० दलघमी इतका पाणीसाठा आरक्षीत ठेवण्यात आला आहे. महाकाली धाम प्रकल्पाचे एकूण क्षमता ३२८.६०० दलघमी असून सध्या अतिशय अल्प उपयुक्त जलसाठा या जलाशयात शिल्लक आहे.पर्जन्यमान दरवर्षी बदलत असते कधी जास्त तर कधी कमी राहते. भविष्यात भूमिगत जलवाहिनीद्वारे धाम प्रकल्प ते येळाकेळीपर्यंत कायम स्वरूपी पाणी आणल्यास पाण्याचीही बचत होणार आहे. याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज असल्याचे तसेच जिल्हा प्रशासनानेही याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने गांभीर्याने विचार करावावर्धा शहरातील व परिसरातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याविषयी प्रशासनानेही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे खा. तडस यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस