शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पाणीसमस्या कायम; उपाययोजना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:21 IST

पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही.

ठळक मुद्देजलकुंभ ठरलेत शोभेचे : नागरिकांत रोष, अनेकांना विकत घ्यावे लागतेय पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही.गाव पाच प्रभागात विभागले असून सहा हजारांवर लोकसंख्या आहे. शेती, मजुरी, नोकरी आणि पशुपालन असे सामान्यत: रहिवाशांचे रोजगाराचे साधन आहे. सध्या तीन जलकुंभ असले तरी सेवाभावीनगरवासीयांसाठी जलकुंभ शोभेचा ठरलेला आहे. अनेक वर्षांपासून तो बंद असून रहिवाशांनाच व्यवस्था करावी लागली आहे. मूळ गाव आणि आदर्शनगर येथे जलस्वराज्य योजनेतील जलकुंभातून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो.मूळ गावात प्रभाग एक, दोन व पाच यांना तीनवेळेत प्रभागाप्रमाणे पाणी सोडण्यात येत असले तरी बहुतांश लोकांना पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. आदर्शनगरात जलसमस्या कायम असून पाण्याबाबत आढावा घेण्यात आला. मात्र, आठवडा लोटूनही आदर्शनगरमध्ये नियोजित विहिरीत मोटार लावण्याचा संबंधितांना मुहूर्त सापडलेला नाही. पशुधनात गाई आणि शेळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास तीस दूध उत्पादक असून काही किरकोळ आहेत. दहा शेळीपालन करणारे आहेत. काहींकडे पंधरा ते वीस शेळ्या आहेत. दोन, तीन शेळ्या पाळणाऱ्यांचीही बºयापैकी संख्या आहे. पशुपालन व्यवसाय असला तरी गावात जनावरांकरिता पाण्याचा हौद नाही. १९६० मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने बांधला होता. आश्रम प्रतिष्ठान आपल्या विहिरीतून ते टाके भरायचे. पण, कालातंराने ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने टाक्याची दुरवस्था झाली. हौद कायमचा बंद झाला. उपयोग नसल्याने नाली बांधकामात हौद तोडण्यात आला. कडक उन्हाळ्यात लोकांना पाणी नाही. तेथे आता जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हौदाची मागणी पशुपालक करू लागले आहेत. ग्रामपंचायतीने दखल घेण्याची गरज आहे.जलस्वराज्यअंतर्गत विहीर व जलकुंभातून मूळ गावात पाणी पुरवठा केला जातो. पाणीपातळी खालावली आहे. शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही. आदर्शनगरमध्ये लवकरच नियोजित विहिरीवर मोटर लावून समस्या निकाली काढण्यात येईल. ग्रा.पं. पाण्याचा हौद निर्माण करून गोपालकांकरिता पाण्याची सुविधा करणार आहे.- संजय गवई, उपसरपंच, सेवाग्राम.पशुपालकांना पाणी समस्या भेडसावत आहे. गाई व शेळ्यांची संख्या वाढली असल्याने घरी व्यवस्था करू शकत नाही. शेळी पालन आमचा व्यवसाय असल्याने पाण्याचा हौद आवश्यक असून त्याची तात्काळ व्यवस्था ग्रा.पं. प्रशासनाने करून द्यावी.- नशीरखाँ पठाणग्रामपंचायत प्रशासनाची नियोजनशून्यतासेवाग्रामात पाणीसमस्या तीव्र झाली आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने रखरखत्या उन्हात कूपनलिका, विहिरींवर धाव घ्यावी लागत आहे. गावात ज्यांच्याकडे पुरेसे पाणी आहे, त्यांनी पाणीविक्री सुरू केली आहे. एकेकाळी पाण्याचा सुकाळ असलेल्या या गावात केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे.