शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पाणीसमस्या कायम; उपाययोजना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:21 IST

पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही.

ठळक मुद्देजलकुंभ ठरलेत शोभेचे : नागरिकांत रोष, अनेकांना विकत घ्यावे लागतेय पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही.गाव पाच प्रभागात विभागले असून सहा हजारांवर लोकसंख्या आहे. शेती, मजुरी, नोकरी आणि पशुपालन असे सामान्यत: रहिवाशांचे रोजगाराचे साधन आहे. सध्या तीन जलकुंभ असले तरी सेवाभावीनगरवासीयांसाठी जलकुंभ शोभेचा ठरलेला आहे. अनेक वर्षांपासून तो बंद असून रहिवाशांनाच व्यवस्था करावी लागली आहे. मूळ गाव आणि आदर्शनगर येथे जलस्वराज्य योजनेतील जलकुंभातून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो.मूळ गावात प्रभाग एक, दोन व पाच यांना तीनवेळेत प्रभागाप्रमाणे पाणी सोडण्यात येत असले तरी बहुतांश लोकांना पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. आदर्शनगरात जलसमस्या कायम असून पाण्याबाबत आढावा घेण्यात आला. मात्र, आठवडा लोटूनही आदर्शनगरमध्ये नियोजित विहिरीत मोटार लावण्याचा संबंधितांना मुहूर्त सापडलेला नाही. पशुधनात गाई आणि शेळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास तीस दूध उत्पादक असून काही किरकोळ आहेत. दहा शेळीपालन करणारे आहेत. काहींकडे पंधरा ते वीस शेळ्या आहेत. दोन, तीन शेळ्या पाळणाऱ्यांचीही बºयापैकी संख्या आहे. पशुपालन व्यवसाय असला तरी गावात जनावरांकरिता पाण्याचा हौद नाही. १९६० मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने बांधला होता. आश्रम प्रतिष्ठान आपल्या विहिरीतून ते टाके भरायचे. पण, कालातंराने ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने टाक्याची दुरवस्था झाली. हौद कायमचा बंद झाला. उपयोग नसल्याने नाली बांधकामात हौद तोडण्यात आला. कडक उन्हाळ्यात लोकांना पाणी नाही. तेथे आता जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हौदाची मागणी पशुपालक करू लागले आहेत. ग्रामपंचायतीने दखल घेण्याची गरज आहे.जलस्वराज्यअंतर्गत विहीर व जलकुंभातून मूळ गावात पाणी पुरवठा केला जातो. पाणीपातळी खालावली आहे. शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही. आदर्शनगरमध्ये लवकरच नियोजित विहिरीवर मोटर लावून समस्या निकाली काढण्यात येईल. ग्रा.पं. पाण्याचा हौद निर्माण करून गोपालकांकरिता पाण्याची सुविधा करणार आहे.- संजय गवई, उपसरपंच, सेवाग्राम.पशुपालकांना पाणी समस्या भेडसावत आहे. गाई व शेळ्यांची संख्या वाढली असल्याने घरी व्यवस्था करू शकत नाही. शेळी पालन आमचा व्यवसाय असल्याने पाण्याचा हौद आवश्यक असून त्याची तात्काळ व्यवस्था ग्रा.पं. प्रशासनाने करून द्यावी.- नशीरखाँ पठाणग्रामपंचायत प्रशासनाची नियोजनशून्यतासेवाग्रामात पाणीसमस्या तीव्र झाली आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने रखरखत्या उन्हात कूपनलिका, विहिरींवर धाव घ्यावी लागत आहे. गावात ज्यांच्याकडे पुरेसे पाणी आहे, त्यांनी पाणीविक्री सुरू केली आहे. एकेकाळी पाण्याचा सुकाळ असलेल्या या गावात केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे.