शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतातील विहिरीवरून आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:57 IST

ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजलसंकटाच्या झळा : सार्वजनिक विहिरीला पडली कोरड

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मार्च व एप्रिल महिन्यात येथे जलसंकट रौद्ररुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने ग्रा.पं. प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.हमदापूर येथील रहिवाशांना सध्या जल समस्येचा सामना करावा लागत आहे. २० ते ३० फुट खोलीवर खोदकामादरम्यान हमदापूर येथे पाणी लागत असे. आता मात्र भुगर्भातील जलपातळी ६५ फुटावर गेल्याचे तेथील रहिवासी सांगतात. यामुळे गावातील बहूतांश विहिरी तळ दाखवत असून काही विहिरींना कोरड पडली आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन या भागात शासकीय नियमांना फाटा देत बोअर केली जात आहे.इतकेच नव्हे तर काही बोअर करणाऱ्यांकडून सध्या नागरिकांच्या अडचणीचा फायदाच घेतल्या जात असल्याचे दिसून येते. विहिरीला कोरड पडल्याने काहींना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. ज्यांची बोअर करण्याची आर्थिक स्थिती नाही अशांना तीन ते चार किमी अंतरावरून बैलगाडीवर मोठाले ड्रम लादून त्याद्वारे शेतातील विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. हमदापूर येथील सुधाकर ढोणे त्यापैकी एक आहेत. ऐन फेबु्रवारीत ही परिस्थिती असून मार्च आणि एप्रिल मध्ये ही परिस्थिती विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावातील सार्वजनिक विहिरीला कोरड पडल्याने शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे. बैलगाडीवर ड्रम लादून त्याद्वारे पाणी आणावे लागत आहे.- सुधाकर ढोणे, रहिवासी, हमदापूर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई