शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शेतातील विहिरीवरून आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:57 IST

ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजलसंकटाच्या झळा : सार्वजनिक विहिरीला पडली कोरड

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मार्च व एप्रिल महिन्यात येथे जलसंकट रौद्ररुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने ग्रा.पं. प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.हमदापूर येथील रहिवाशांना सध्या जल समस्येचा सामना करावा लागत आहे. २० ते ३० फुट खोलीवर खोदकामादरम्यान हमदापूर येथे पाणी लागत असे. आता मात्र भुगर्भातील जलपातळी ६५ फुटावर गेल्याचे तेथील रहिवासी सांगतात. यामुळे गावातील बहूतांश विहिरी तळ दाखवत असून काही विहिरींना कोरड पडली आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन या भागात शासकीय नियमांना फाटा देत बोअर केली जात आहे.इतकेच नव्हे तर काही बोअर करणाऱ्यांकडून सध्या नागरिकांच्या अडचणीचा फायदाच घेतल्या जात असल्याचे दिसून येते. विहिरीला कोरड पडल्याने काहींना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. ज्यांची बोअर करण्याची आर्थिक स्थिती नाही अशांना तीन ते चार किमी अंतरावरून बैलगाडीवर मोठाले ड्रम लादून त्याद्वारे शेतातील विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. हमदापूर येथील सुधाकर ढोणे त्यापैकी एक आहेत. ऐन फेबु्रवारीत ही परिस्थिती असून मार्च आणि एप्रिल मध्ये ही परिस्थिती विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावातील सार्वजनिक विहिरीला कोरड पडल्याने शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे. बैलगाडीवर ड्रम लादून त्याद्वारे पाणी आणावे लागत आहे.- सुधाकर ढोणे, रहिवासी, हमदापूर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई