शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:08 IST

मागीलवर्षी वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देकोरडेठाक जलाशय झाले पाणीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आषाढसरींच्या दमदार आगमनाने जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेले जलायश पाणीदार झाले. परंतु, मागीलवर्षी या दिवसापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवली. यावर्षीसुद्धा पावसाअभावी ही टंचाई आणखीच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोपलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. आठवडाभर संततधार राहिल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत जिवंत झाले. इतकेच नव्हे, तर या पावसाच्या सरींमुळे शेतशिवारातही हिरवळ दाटली आहे. यावर्षी आतापर्यंत आठही तालुक्यात ४९१.३८ मि.मी. (५३.३७ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. शेतपिकांचे फारसे नुकसान झाले नसून पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जलाशयाची पातळीने बऱ्यापैकी वाढली असून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शहरासह १३ गावांना मिळाला आधार‘मरणाला रात्र आडवी’ ही म्हण नेहमी ऐकली जाते.पण, ही परिस्थिती यावर्षी वर्धेकरांनी अनुभवली आहे. वर्ध्यासह लगतच्या १३ गावांना महाकाळीच्या धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी या जलाशयातील मृतसाठाही उचलण्यात आला. मृतसाठ्यातून शेवटचे पाणी सोडून पाणीपुरवठा केल्यांनतर पुढे पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. गांभीर्य लक्षात घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आषाढसरींनी संततधार कायम ठेवल्याने या संकटावर पांघरूण पडले आणि पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या धाम जलाशयात ३०.२९ टक्के (१८.०२ दलघमी) जलसंचय झाला आहे. मागीलवर्षी याच दिवसापर्यंत ३२.७५ टक्के जलसाठा होता.

टॅग्स :Rainपाऊस