शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:08 IST

मागीलवर्षी वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देकोरडेठाक जलाशय झाले पाणीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आषाढसरींच्या दमदार आगमनाने जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेले जलायश पाणीदार झाले. परंतु, मागीलवर्षी या दिवसापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवली. यावर्षीसुद्धा पावसाअभावी ही टंचाई आणखीच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोपलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. आठवडाभर संततधार राहिल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत जिवंत झाले. इतकेच नव्हे, तर या पावसाच्या सरींमुळे शेतशिवारातही हिरवळ दाटली आहे. यावर्षी आतापर्यंत आठही तालुक्यात ४९१.३८ मि.मी. (५३.३७ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. शेतपिकांचे फारसे नुकसान झाले नसून पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जलाशयाची पातळीने बऱ्यापैकी वाढली असून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शहरासह १३ गावांना मिळाला आधार‘मरणाला रात्र आडवी’ ही म्हण नेहमी ऐकली जाते.पण, ही परिस्थिती यावर्षी वर्धेकरांनी अनुभवली आहे. वर्ध्यासह लगतच्या १३ गावांना महाकाळीच्या धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी या जलाशयातील मृतसाठाही उचलण्यात आला. मृतसाठ्यातून शेवटचे पाणी सोडून पाणीपुरवठा केल्यांनतर पुढे पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. गांभीर्य लक्षात घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आषाढसरींनी संततधार कायम ठेवल्याने या संकटावर पांघरूण पडले आणि पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या धाम जलाशयात ३०.२९ टक्के (१८.०२ दलघमी) जलसंचय झाला आहे. मागीलवर्षी याच दिवसापर्यंत ३२.७५ टक्के जलसाठा होता.

टॅग्स :Rainपाऊस