शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:08 IST

मागीलवर्षी वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देकोरडेठाक जलाशय झाले पाणीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आषाढसरींच्या दमदार आगमनाने जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेले जलायश पाणीदार झाले. परंतु, मागीलवर्षी या दिवसापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवली. यावर्षीसुद्धा पावसाअभावी ही टंचाई आणखीच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोपलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. आठवडाभर संततधार राहिल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत जिवंत झाले. इतकेच नव्हे, तर या पावसाच्या सरींमुळे शेतशिवारातही हिरवळ दाटली आहे. यावर्षी आतापर्यंत आठही तालुक्यात ४९१.३८ मि.मी. (५३.३७ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. शेतपिकांचे फारसे नुकसान झाले नसून पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जलाशयाची पातळीने बऱ्यापैकी वाढली असून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शहरासह १३ गावांना मिळाला आधार‘मरणाला रात्र आडवी’ ही म्हण नेहमी ऐकली जाते.पण, ही परिस्थिती यावर्षी वर्धेकरांनी अनुभवली आहे. वर्ध्यासह लगतच्या १३ गावांना महाकाळीच्या धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी या जलाशयातील मृतसाठाही उचलण्यात आला. मृतसाठ्यातून शेवटचे पाणी सोडून पाणीपुरवठा केल्यांनतर पुढे पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. गांभीर्य लक्षात घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आषाढसरींनी संततधार कायम ठेवल्याने या संकटावर पांघरूण पडले आणि पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या धाम जलाशयात ३०.२९ टक्के (१८.०२ दलघमी) जलसंचय झाला आहे. मागीलवर्षी याच दिवसापर्यंत ३२.७५ टक्के जलसाठा होता.

टॅग्स :Rainपाऊस