शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:09 IST

यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहूतांश भागात अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावल्याचे ....

ठळक मुद्देसमुद्रपूर अन् हिंगणघाटात धोका अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहूतांश भागात अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावल्याचे समोर आल्याचे चिंता वाढली आहे. सर्वेक्षणात हिंगणघाट तालुक्यातील वडनेर, खापरी, धानोरा आणि समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी, बर्फा, सावंगी (झाडे) भागातील पाणी पातळी सर्वाधिक खोल गेल्याची नोंद झाली आहे. यामुळे या गावात येत्या दिवसात पाणी टंचाई भेडसावल्यास नवल वाटणार नाही.जुन ते सप्टेंबर या कालावधीत ९२०.७१ मि.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असताना यंदा ७६४.२६ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा १५६.४५ मि.मी. पाऊस कमी झाला. यामुळे पाण्याच्या पातळीत घट होणे अपेक्षित होते. मात्र झालेली घट मोठी असल्याचे भूजल विभाग चांगलात चिंतेत पडला आहे. पाऊस कमी झाल्याने जलसाठेही कोरडे पडले आहेत. परिणाती रबी हंगामाकरिता शेतकºयांना धरणातून नाही तर त्यांच्याकडे असलेल्या विहिरींतून पाणी घ्यावे लागत आहे. होत असलेल्या या उपस्यामुळे पाण्याच्या पातळीत आणखीच झपाट्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. येत्या उन्हाळ्याच्या दिवसात जल संकटाला तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात एकूण ३९ पाणलोट क्षेत्रात ११२ निरीक्षण विहिरी आहेत. त्याचे सर्वेक्षण नुकतेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून झाले आहे. आॅक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत पाणीटंचाई निर्माण होणार नाही असे वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमुद केले आहे; परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्या कुठल्या भागाला जल संकटाचा सामना करावा लागेल याचे चित्र जानेवारी महिन्यात स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे.पर्जन्यमानाची तीन तालुक्यातील तूट २४ टक्केगत वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. जुन ते सप्टेंबर या कालावधीत ९२०.७१ मी.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असताना यंदा केवळ ७६४.२६ मी.मी. पर्जन्यमान झाले. समुद्रपूर, देवळी व आष्टी तालुक्यात यंदा पर्जन्यमानातील तुट सुमारे २४ टक्के असल्याचे सांगण्यात आले.जलयुक्त शिवार योजनेने दिला आधारजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे झाली आहेत. सन २०१५-१६ मध्ये २१२ गावांची निवड करून ३ हजार ३००, सन २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड करून २ हजार २४४ कामे करण्यात आली. तर यंदाच्या वर्षी ६७ गावांची निवड करून तेथे १३८ जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाय योजनेची जिल्ह्यात कामे झाल्यामुळे यंदाच्या अल्प पाऊसाचा सध्यातरी परिणाम जाणवत नसल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. खºया अर्थाने यंदा जलयुक्त शिवार योजनेंतगत झालेल्या जलसंधारणांच्या कामांनीच जिल्ह्याला आधार दिला आहे.काही ठिकाणी वाढ तर काही ठिकाणी घटयंदाच्या सप्टेंबर महिन्यामधील पाण्याच्या पातळीची गत पाच वर्षांशी तुलना केली असता १४ पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी १ ते २ मिटरने पाणी पातळीत घट आढळून आली आहे. १९ पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी ०.५ ते १ मिटर घट आढळून आली आहे. शिवाय सहा पाणलोट क्षेत्रात पाणी पातळीत सरासरी ०.५ ते १ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाणी पातळीत वाढ झालेल्यात कारंजा तालुक्यातील डब्लू. आर. के. १, के. २, जे ४ व आर्वी तालुक्यातील डब्लू. आर. व्ही.२, डब्लू. आर. व्ही.३ तसेच हिंगणघाट तालुक्यातील डब्लू. आर. २३ निरीक्षण विहिरीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Waterपाणी