शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

इसापुरात श्रमदानातून वॉटर कप स्पर्धेचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:06 IST

पाणी फाउंडेशनद्वारे आयोजियत वॉटर कप स्पर्धेत ईसापूर गावाने सहभाग घेतला आहे. गावातीला भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या दुष्कळाशी दोनहात करण्याचे गावकºयांनी ठरविले आणि श्रमदानातून स्पर्धेचा बिगुल फुंकला.

ठळक मुद्देविरूळात रणरागीणी सरसावल्याजैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क जेसीबी व पोकलॅन्ड

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : पाणी फाउंडेशनद्वारे आयोजियत वॉटर कप स्पर्धेत ईसापूर गावाने सहभाग घेतला आहे. गावातीला भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या दुष्कळाशी दोनहात करण्याचे गावकºयांनी ठरविले आणि श्रमदानातून स्पर्धेचा बिगुल फुंकला.गावात आषाढी एकादशी निमित्य महाश्रमदान झाले. या महाश्रमदानाला देवळी येथील नायब तहसीलदार भागवत, ग्रामसेवक पुजा आडे, सरपंच प्रणिता आंबटकर, उपसरपंचासह सदस्य, शिपाई, ग्रामसेवक संघटना, वैद्यकीय जनतागृतीमंचाचे सदस्य, सद्भावना ग्रामीण विकास संस्था, स्वयंसेवक, मुरदगांव, लोणी येथील वॉटर हिरो, पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक अशोक बगाडे, तालुका समन्वयक दीपक तपासे, ज्योती ठाकरे, सामाजिक प्रशिक्षक प्रशांत देवळे, पूष्पा नागले, तांत्रिक प्रशिक्षक अजित डंभारे, हर्षवर्धन बनोकर, हरिदास महाजन, आपले सरकार, गावातील नागरिकांचा सहभाग होता.यावेळी तहसीलदार भागवत यांनी मार्गदर्शन केले. या श्रमदानमुळे गावात भविष्यात भेडसावणारी पाणी टंचाई सूटनार व गाव पाणीदार होण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. श्रमदानाकरिता गवातील जुळलेल्या लोकांची संख्या पाहुन हा विश्वास सर्व अधिकारी व लोकांना मिळाला. या श्रमदानामुळे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून आतापर्यंत जे या चळवळीत जुळले नसतील त्यांनी ईसापूर येथे येत श्रमदान करून या चळवळीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.विरूळात रणरागीणी सरसावल्याविरुळ (आकाजी) - आर्वी तालुक्यातील खैरी या आदिवासी बहुल गावातील पाच उच्चशिक्षीत तरुणींनी भल्या पहाटे हातात पावडे व टोपले घेवुन गावातील दुष्काळ कायमचाच हटवायचा व गाव पाणीदार करायचे ही जिद्द बाळगली. त्यांच्या जिद्दीला आता गावकºयांचेही सहकार्य लाभत आहे.विरुळ पासून पाच किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या आदिवासीबहुल गावात दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई असते. गावातील दुष्काळ कायमचाच संपवावा यासाठी या पाच रणरागीणींनी पुढाकार घेतला. या पाचपैकी अश्विनी ही बँकेत नोकरी करते व तिच्या सोबतीला अंकीता, सुनीता, समीना व नेहा या दहावी-बारावीतल्या मुलींनी भल्या पहाटे हातात टोपले व पावडे घेवुन श्रमदान करायला सुरूवात केली. वॉटर कप स्पर्धेत पाण्याचे महत्त्व गावकºयांना पटवून दिले. गावकºयांना ही बाब पटली. बघता -बघता अख्ख गाव या मुलींच्या मागे धावून आलं व रोज सकाळी श्रमदानाला सुरूवात झाली. गावात प्रत्येक घरी शोष खड्डे, नाल्यावर दगडी बांध, सीसीटी, तलावाचे खोलीकरण आदी कामे झाली. गावकºयांच्या परिश्रमातून दुष्काळ कायमचाच संपेल, असा दृढ विश्वास गावकºयांत आहे. या तरुणींनी तलावातून माती आणून रोपवाटीका तयार केली. पावसाळ्यात बांधावर व घरी एक तरी झाड लावण्याची तयारी सुरु आहे. याकरिता सुवालाल कासार, अंकुश लवाने, किरण कुभेकार, राजु कुंभेकार, जीवन चोरमुले, तुळशीदास कुंभेकार, चंन्द्रशेखर गायकवाड व गावकर्यांचे सहकार्य लाभत आहे.जैन संघटनेच्यावतीने नि:शुल्क जेसीबी व पोकलॅन्डवर्धा- दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अभियानात भारतीय जैन संघटनेचे संस्थापक भाऊ शांतिलालजी मुथा महाराष्ट्र दौरावर आहेत. त्यांची सभा सोमवारी (दि.२३) रोजी विकास भवन येथे आयोजित आहे. पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कार्यात जे गांव श्रमदानाचा विशिष्ट टप्पा पार करतील त्या सर्व गावांना बीजेएस नि:शुल्क जेसीबी, पोकलेन मशीन पुरवून कठीण कार्य पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. जिल्ह्यातील चार तहसील या स्पर्धेत सहभागी आहे. या सभेत सर्व सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, कृषी अधिकारी, पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहतील. कार्यक्रमचे मुख्य अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. अनिल सोले उपस्थित राहतील. या सभेला सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थाच्या सदस्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती योगेंद्र फत्तेपुरिया, अनिल फरसोले,मनोज श्रावणे, अभिषेक बैद, स्वाती ढोबले, शैलेन्द्र दफ्तरी, रितेश लुनावत, विवेक कांकरिया आदींनी केले आहे. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा