शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराचा पिकांना फायदा होणार

By admin | Updated: August 22, 2015 02:21 IST

महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात...

वर्धा : महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात जुन्या सिमेंट बंधाऱ्याचे नूतनीकरण, नालाखोलीकरण, रुंदीकरण व शेततळे उभारण्याचे काम नियोजित आहे. याचा अपेक्षित निधी ५४ लाख आहे. याचा खरीप व रबी दोन्ही हंगामात फायदा होईल, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले. सास्ती येथे आमदार कुणावार यांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणीही त्यांनी केली. सध्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाची चार कामे झालेली असून कामाची लांबी ५६० मिटर आहे. त्यावर ११.७५ लाख रुपये खर्च झाला आहे. सदर नाला खोलीकरण व रुंदीकरण कामामुळे २७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शिवारातील नाल्याच्या परिघातील १७ विहिरीच्या जलस्तरामध्ये १०० टक्के वाढ झालेली आहे. दुबार व तिबार हंगामासाठी सिंचनाची व्यवस्था झालेली असल्याचेही ते म्हणाले. गावचे सरपंच विकास इंगळे आमदार कुणावार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. ता.कृ.अ. एस.डी.साखरे व मोरे यांनी सदरील कामाचे उद्दीष्ट, उपलब्ध पाणी साठा व कामावर झालेला खर्च या बाबत सविस्तर माहिती दिली. मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जलपुजन कार्यक्रमाला जि. प. सदस्य माधुरी चंदनखेडे, वसंत आंबटकर, प्रफुल्ल बाहे, माजी जि. प.सदस्य ओंकार मानकर, पं. स.सदस्य माधव चंदनखेडे, उपसरपंच सरोज बोरकर, ग्रा. पं. सदस्य गजानन उमाटे, डॉ. टी. वाय. ठाकरे, प्रा. किरण वैद्य, ग्रा. प. पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता एस. आर. रहाटे, ए. व्ही. कोहळे, आर. जी. कुबडे, अमोल भडे, गुजरकर आदींनी सहकार्य केले.