शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जलयुक्त शिवाराचा पिकांना फायदा होणार

By admin | Updated: August 22, 2015 02:21 IST

महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात...

वर्धा : महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात जुन्या सिमेंट बंधाऱ्याचे नूतनीकरण, नालाखोलीकरण, रुंदीकरण व शेततळे उभारण्याचे काम नियोजित आहे. याचा अपेक्षित निधी ५४ लाख आहे. याचा खरीप व रबी दोन्ही हंगामात फायदा होईल, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले. सास्ती येथे आमदार कुणावार यांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणीही त्यांनी केली. सध्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाची चार कामे झालेली असून कामाची लांबी ५६० मिटर आहे. त्यावर ११.७५ लाख रुपये खर्च झाला आहे. सदर नाला खोलीकरण व रुंदीकरण कामामुळे २७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शिवारातील नाल्याच्या परिघातील १७ विहिरीच्या जलस्तरामध्ये १०० टक्के वाढ झालेली आहे. दुबार व तिबार हंगामासाठी सिंचनाची व्यवस्था झालेली असल्याचेही ते म्हणाले. गावचे सरपंच विकास इंगळे आमदार कुणावार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. ता.कृ.अ. एस.डी.साखरे व मोरे यांनी सदरील कामाचे उद्दीष्ट, उपलब्ध पाणी साठा व कामावर झालेला खर्च या बाबत सविस्तर माहिती दिली. मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जलपुजन कार्यक्रमाला जि. प. सदस्य माधुरी चंदनखेडे, वसंत आंबटकर, प्रफुल्ल बाहे, माजी जि. प.सदस्य ओंकार मानकर, पं. स.सदस्य माधव चंदनखेडे, उपसरपंच सरोज बोरकर, ग्रा. पं. सदस्य गजानन उमाटे, डॉ. टी. वाय. ठाकरे, प्रा. किरण वैद्य, ग्रा. प. पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता एस. आर. रहाटे, ए. व्ही. कोहळे, आर. जी. कुबडे, अमोल भडे, गुजरकर आदींनी सहकार्य केले.