शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

तालुक्यात दहा गावांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:18 IST

एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची गरज

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. यात या दहा गावांतील ४ हजार ८८८ लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.आर्वी तालुक्यातील धनोडी, टेंभरी, परसोडी, एकलारा, कर्माबाद, पिंपळझरी, मारडा, दिघी, साखखेडा, हिवरा या दहा गावांचा पाणीटंचाईत समावेश आहे. याबाबत १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई उपाययोजना कृती आराखडा अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनेला सुरूवात झाली आहे. आर्वी तालुक्यातील या दहा गावांना पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.या दहा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी २२ सार्वजनिक विहिरी, २२ खासगी विहिरी, ३१ हातपंप, दोन विद्युतपंप व सहा नळयोजना अशा उपाययोजना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सूचविण्यात आल्या आहेत. हे सर्व पाण्याचे स्त्रोत असले तरी नवीन कृती आराखड्यानुसार एक सार्वजनिक विहीर खोल करणे, तीन गावांत खासगी विहिरीचे बांधकाम करणे तथा अधिग्रहण करणे, सहा ठिकाणी नवीन हातपंप बसविणे, धनोडी व एकलारा या गावात नळयोजनेची विहीर दुरूस्त करणे, टेंभरी येथे पाईपलाईन दुरूस्त करणे, आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला अआहे. यात या गावांत येत्या तीन महिन्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दखल घेत कार्यवाही करणे गरजेचे आहे.आर्वी तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृती आराखड्यांतर्गत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहित करणे तथा नळयोजना व इतर तातडीच्या उपाययोजना आखणे सुरू आहे.- प्रा. धर्मेंद्र राऊत, उपसभापती, पं.स. आर्वी.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई