शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

चण्याच्या खरेदीला गोदामाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:39 IST

शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे.

ठळक मुद्देशासकीय वेअरहाऊस फुल्ल : शेतकऱ्यांची तूर बाजार समितीच्या आवारातच

ऑनलाईन लोकमतवर्धा : शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दिलेल्या मुदतीत चण्याची खरेदी सुरू होईल अथवा नाही या बाबत संशय निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रबी हंगामात चण्याचे पीक घेणारे शेतकरी अनेक आहेत. या शेतकऱ्यांकडून आता त्यांचे चण्याचे पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे काढलेला चणा घरी ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांकडून तो बाजारात विक्रीकरिता आणल्या जात आहे. शेतकºयाचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा प्रकार याही हंगामात होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकºयांना किमान हमीभाव मिळावा याकरिता शासकीय खरेदीकडे त्यांच्या नजरा आहेत. शासनाने खरेदीच्या सूचना दिल्या. यानुसार खरेदी सुरू करणे अनिवार्य आहे. मात्र गोदामात जागा नसल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांना पडला आहे. नाफेडच्या मार्फत खरेदी होणारी तूर आणि इतर शेतमाल ठेवण्याकरिता जिल्ह्यात दोन गोदाम आहेत. यातील एक एमआयडीसी तर दुसरे बोरगाव (मेघे) परिसरात आहे. या दोन्ही गोदामात सध्या तूर आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीमुळे गोदाम फुल्ल आहे. यामुळे बरीच तूर बाजार समितीत पडून आहे. यात आता चणा खरेदी सुरू करण्याच्या सूचना आहेत. यानुसार कार्यवाही केल्यास खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न खरेदी यंत्रणेला पडला आहे.बाजारातून शेतमाल नेण्याकरिता वाहतुकीचीही अडचणखरेदी झालेला धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था असणे अनिवार्य आहे. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर या वाहतुकदारांची देयके अदा करण्यात आली नसल्याने त्यांच्याकडून धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता टाळाटाळ होत असल्याची माहिती आहे. यामुळे खरेदी झालेला शेतमाल बाजार समितीतच पडून आहे.या वाहतुकदारांकडून देण्यात आलेले दर शासनाच्या दरापेक्षा अधिक असल्याने ही अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. धान्य वाहतुकीकरिता दोन किमी अंतराकरिता ६९ रुपये किमी दर ठरविले आहे. या उलट खासगी वाहतुकदारांकडून १२० रुपये किमीचे दर लावले जात आहे. याचा परिणाम येथे पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे ही अडचण आणखीच तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे.हिंगणघाट, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात वाहतुकीची अडचण अधिक असल्याची माहिती आहे. तर कारंजा (घाडगे) येथे अंतराची समस्या या कामात आडकाठी ठरत आहे.शेतमाल गोदामात गेल्याशिवाय चुकारे नाहीशेतकºयांचा शेतमाल खरेदी झाल्यानंतर त्याची जोपर्यंत शासनाच्या वेअर हाऊसच्या खात्यावर नोंद होत नाही तोपर्यंत शेतकºयाचे चुकारे मिळत नाही. सध्या गोदामात जागा नसल्याने शेतकºयांची अडचण वाढत असून चुकाºयांकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.