शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चण्याच्या खरेदीला गोदामाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:39 IST

शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे.

ठळक मुद्देशासकीय वेअरहाऊस फुल्ल : शेतकऱ्यांची तूर बाजार समितीच्या आवारातच

ऑनलाईन लोकमतवर्धा : शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दिलेल्या मुदतीत चण्याची खरेदी सुरू होईल अथवा नाही या बाबत संशय निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रबी हंगामात चण्याचे पीक घेणारे शेतकरी अनेक आहेत. या शेतकऱ्यांकडून आता त्यांचे चण्याचे पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे काढलेला चणा घरी ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांकडून तो बाजारात विक्रीकरिता आणल्या जात आहे. शेतकºयाचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा प्रकार याही हंगामात होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकºयांना किमान हमीभाव मिळावा याकरिता शासकीय खरेदीकडे त्यांच्या नजरा आहेत. शासनाने खरेदीच्या सूचना दिल्या. यानुसार खरेदी सुरू करणे अनिवार्य आहे. मात्र गोदामात जागा नसल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांना पडला आहे. नाफेडच्या मार्फत खरेदी होणारी तूर आणि इतर शेतमाल ठेवण्याकरिता जिल्ह्यात दोन गोदाम आहेत. यातील एक एमआयडीसी तर दुसरे बोरगाव (मेघे) परिसरात आहे. या दोन्ही गोदामात सध्या तूर आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीमुळे गोदाम फुल्ल आहे. यामुळे बरीच तूर बाजार समितीत पडून आहे. यात आता चणा खरेदी सुरू करण्याच्या सूचना आहेत. यानुसार कार्यवाही केल्यास खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न खरेदी यंत्रणेला पडला आहे.बाजारातून शेतमाल नेण्याकरिता वाहतुकीचीही अडचणखरेदी झालेला धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था असणे अनिवार्य आहे. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर या वाहतुकदारांची देयके अदा करण्यात आली नसल्याने त्यांच्याकडून धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता टाळाटाळ होत असल्याची माहिती आहे. यामुळे खरेदी झालेला शेतमाल बाजार समितीतच पडून आहे.या वाहतुकदारांकडून देण्यात आलेले दर शासनाच्या दरापेक्षा अधिक असल्याने ही अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. धान्य वाहतुकीकरिता दोन किमी अंतराकरिता ६९ रुपये किमी दर ठरविले आहे. या उलट खासगी वाहतुकदारांकडून १२० रुपये किमीचे दर लावले जात आहे. याचा परिणाम येथे पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे ही अडचण आणखीच तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे.हिंगणघाट, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात वाहतुकीची अडचण अधिक असल्याची माहिती आहे. तर कारंजा (घाडगे) येथे अंतराची समस्या या कामात आडकाठी ठरत आहे.शेतमाल गोदामात गेल्याशिवाय चुकारे नाहीशेतकºयांचा शेतमाल खरेदी झाल्यानंतर त्याची जोपर्यंत शासनाच्या वेअर हाऊसच्या खात्यावर नोंद होत नाही तोपर्यंत शेतकºयाचे चुकारे मिळत नाही. सध्या गोदामात जागा नसल्याने शेतकºयांची अडचण वाढत असून चुकाºयांकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.