शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही वर्धेकरांचा सुसाट संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले.

ठळक मुद्देरस्त्यावरील गर्दी रात्रीपर्यंत कायमच : पोलिसांचाही अल्पावधीतच हटला पहारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी याला वर्धेकरांनी हरताळ फासल्याचे चित्र बघायला मिळाले. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर नागरिकांचा मुक्त संचार राहिल्याने ही स्थिती कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले. पोलिसांनीही शहरातील शिवाजी चौक, आर्वीनाका, पावडे चौक आदी परिसरात नाकेबंदी करुन नागरिकांना सूचना केल्यात. तसेच शिवाजी चौकामध्ये वाहने अडवून काहींकडून दंडही आकारण्यात आला. पण, पोलिसांचीही नाकेबंदी औटघटकेची ठरल्याने नागरिकही सुसाट झालेत. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी ओसरलेले पहावयास मिळाली पण, बसस्थानकाबाहेर गर्दी दिसून आली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी संचारबंदीचे तीनतेरा वाजलेलेच दिसून आले.

आदेशानंतरही खासगी शाळा सुरुचशासनाच्या आदेशानुसार सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आहे. इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेकरिता नियमात शिथिलता देण्यात आली आहे. असे असतानाही गुरुवारी बऱ्याच खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती दिसून आली आहे. शाळा व्यवस्थापनही शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करीत असल्याने यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुंभमेळ्यातून येणाऱ्यांनी आधी तपासणी करावी जिल्ह्यातील काही भाविक कुंभमेळ्याकरिता गेले आहेत. ते परतीच्या मार्गावर असून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सर्व भक्तांनी जिल्ह्यात आल्यानंतर स्वत: कोविड सेंटरमध्ये जावून तपासणी करुन घ्यावी. तसेच गृहविलगीकरणात राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कुंभमेळ्याकरिता गेलेल्यांची माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व एसपी प्रशांत होळकर यांनी केले.

आता दंड नकोत, दंडुकाच हवाय !

प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याकरिता उपाययोजना करुन ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन केले जात आहे. पंधरा दिवस संचारबंदी कायम ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाकडूनही कंबर कसण्यात आली आहे. याकरिता ९० पोलीस अधिकारी, ७०० पोलीस कर्मचारी तर ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पोलीस प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. पण, नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे आता दंड नकोत, दंडाच हवाय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्यापूर्वीच ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ओळखून या महामारीच्या काळातसर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस