शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

बंदीनंतरही वर्धेकरांचा सुसाट संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले.

ठळक मुद्देरस्त्यावरील गर्दी रात्रीपर्यंत कायमच : पोलिसांचाही अल्पावधीतच हटला पहारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी याला वर्धेकरांनी हरताळ फासल्याचे चित्र बघायला मिळाले. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर नागरिकांचा मुक्त संचार राहिल्याने ही स्थिती कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले. पोलिसांनीही शहरातील शिवाजी चौक, आर्वीनाका, पावडे चौक आदी परिसरात नाकेबंदी करुन नागरिकांना सूचना केल्यात. तसेच शिवाजी चौकामध्ये वाहने अडवून काहींकडून दंडही आकारण्यात आला. पण, पोलिसांचीही नाकेबंदी औटघटकेची ठरल्याने नागरिकही सुसाट झालेत. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी ओसरलेले पहावयास मिळाली पण, बसस्थानकाबाहेर गर्दी दिसून आली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी संचारबंदीचे तीनतेरा वाजलेलेच दिसून आले.

आदेशानंतरही खासगी शाळा सुरुचशासनाच्या आदेशानुसार सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आहे. इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेकरिता नियमात शिथिलता देण्यात आली आहे. असे असतानाही गुरुवारी बऱ्याच खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती दिसून आली आहे. शाळा व्यवस्थापनही शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करीत असल्याने यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुंभमेळ्यातून येणाऱ्यांनी आधी तपासणी करावी जिल्ह्यातील काही भाविक कुंभमेळ्याकरिता गेले आहेत. ते परतीच्या मार्गावर असून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सर्व भक्तांनी जिल्ह्यात आल्यानंतर स्वत: कोविड सेंटरमध्ये जावून तपासणी करुन घ्यावी. तसेच गृहविलगीकरणात राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कुंभमेळ्याकरिता गेलेल्यांची माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व एसपी प्रशांत होळकर यांनी केले.

आता दंड नकोत, दंडुकाच हवाय !

प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याकरिता उपाययोजना करुन ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन केले जात आहे. पंधरा दिवस संचारबंदी कायम ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाकडूनही कंबर कसण्यात आली आहे. याकरिता ९० पोलीस अधिकारी, ७०० पोलीस कर्मचारी तर ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पोलीस प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. पण, नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे आता दंड नकोत, दंडाच हवाय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्यापूर्वीच ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ओळखून या महामारीच्या काळातसर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस