शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

निर्मलग्राम अभियानात वर्धेची राज्यात आघाडी

By admin | Updated: July 17, 2014 00:14 IST

निर्मल भारत अभियानांतर्गत ‘प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने मागील दोन वर्षांपासून राज्यस्तरावर दिलेले उद्दीष्ट पूर्ण केले आहे़ जिल्ह्यात २८ हजार ९२५ शौचालयांचे

कारंजा अव्वल : ६० पैकी ५७ गावे निर्मलवर्धा : निर्मल भारत अभियानांतर्गत ‘प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने मागील दोन वर्षांपासून राज्यस्तरावर दिलेले उद्दीष्ट पूर्ण केले आहे़ जिल्ह्यात २८ हजार ९२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे़ संपूर्ण कारंजा तालुका निर्मल झाल्यानंतर मार्च अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा निर्मल करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे.निर्मल भारत अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात सुरू आहे. बेसलाईन सर्वेक्षणानुसार ९५ हजार कुटुंब आहे़ प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमांतर्गत शौचालय बांधकामासाठी १० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येते. यात निर्मल भारत अभियानांतर्गत ४ हजार ५०० तर मनरेगातर्फे ६ हजार ५०० रुपयांच्या निधीचा समावेश आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्रत्येक तालुक्यात सरपंच तसेच ग्रामसेवकांना प्रवृत्त करून शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन देऊन संपूर्ण वर्धा जिल्हा निर्मल जिल्हा करण्याचा संकल्प केला़ जिल्ह्यात २८ हजार ९२५ शौचालये बांधून झाले असून शासनाच्या १६ हजार ७१ उद्दीष्टापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले़ यावर्षी जून अखेरपर्यंत १० हजार ३९९ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले़ ५ हजार ७२६ शौचालये प्रगतीपथावर आहे. मार्च अखेरपर्यंत १८ हजार ५२६ शौचालय बांधून पूर्ण झाले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)कारंजा पंचायत समितीची आघाडीकारंजा पंचायत समिती अंतर्गत ६० गावांचा समावेश असून मागील वर्षी ३१ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी २६ ग्रामपंचायती पुरस्कारासाठी सज्ज आहेत. निर्मलग्राम ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबांनी राबवावी, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने जनजागृतीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला़ यामुळे निर्मलग्रामचे उद्दीष्ट साध्य होईल, असा विश्वास मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केला़ कारंजा पंचायत समितीला ८ हजार ३६१ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट आहे़ पैकी ५ हजार ४३३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर ७०० शौचालय प्रगतिपथावर आहेत.