शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देआर्वी-अमरावती मार्ग बंद । अप्पर वर्धाच्या ३३ दारांतून पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोसळधारेमुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील देऊरवाडा-कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. याकरिता आर्वी-अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आर्वी परिसरात मागील ३६ तासांपासून संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूस निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात संचयित झालेले पाणी वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून ३३ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहेदेऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारानिम्न वर्धा धरणाची पूर्ण दारे उघडण्यात आली असून या ३१ दारातून १.३ मीटर एकूण सिसर्ग घन मीटर प्रतिसेकंद ३ हजार ४६६ क्युसेक्स पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी निम्न वर्धा धरणाच्या ३१ दारांतून ३० सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्धा नदी काठावरील धनोडी बहाद्दरपूर, वडगाव (पांडे), दिघी (होणाडे) सायखेडा, देऊरवाडा आदी एकूण २३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे धनोडी यांनी दिली.बोरचे तीन दरवाजे ३० सेंमीने उघडलेसेलू -सध्या बोरधरण ९०.८१ टक्के भरले आहे. धरणातून शनिवारी दुपारी ४ वाजता ३ दरवाजे ३० सेंमी उघडून ६६ क्युसेक्स पाणी बोर नदीपात्रात सोडण्यात आले. नदीकाठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. बोरधरणाचा एकूण जलसाठा १२३.२१२ दलघमी आहे. शनिवारी पाणी पातळी ३१९.५२ मीटर व साठा १११.८८३५ दलघमी असा साठा ९०.८१ टक्के आहे. धरणाचे परिचलन आराखड्यानुसार बोर प्रकल्पातून ३ दरवाजे ३० सेंमीने उघडून त्यामधून ६६ क्युसेक पाणी बोरनदीपात्रात सोडण्यात आले. पातळीत वाढ झाल्याने कितीही वेळा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकते, असे उपविभागीय अभियंता भालेराव यांनी म्हटले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर