शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देआर्वी-अमरावती मार्ग बंद । अप्पर वर्धाच्या ३३ दारांतून पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोसळधारेमुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील देऊरवाडा-कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. याकरिता आर्वी-अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आर्वी परिसरात मागील ३६ तासांपासून संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूस निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात संचयित झालेले पाणी वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून ३३ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहेदेऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारानिम्न वर्धा धरणाची पूर्ण दारे उघडण्यात आली असून या ३१ दारातून १.३ मीटर एकूण सिसर्ग घन मीटर प्रतिसेकंद ३ हजार ४६६ क्युसेक्स पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी निम्न वर्धा धरणाच्या ३१ दारांतून ३० सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्धा नदी काठावरील धनोडी बहाद्दरपूर, वडगाव (पांडे), दिघी (होणाडे) सायखेडा, देऊरवाडा आदी एकूण २३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे धनोडी यांनी दिली.बोरचे तीन दरवाजे ३० सेंमीने उघडलेसेलू -सध्या बोरधरण ९०.८१ टक्के भरले आहे. धरणातून शनिवारी दुपारी ४ वाजता ३ दरवाजे ३० सेंमी उघडून ६६ क्युसेक्स पाणी बोर नदीपात्रात सोडण्यात आले. नदीकाठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. बोरधरणाचा एकूण जलसाठा १२३.२१२ दलघमी आहे. शनिवारी पाणी पातळी ३१९.५२ मीटर व साठा १११.८८३५ दलघमी असा साठा ९०.८१ टक्के आहे. धरणाचे परिचलन आराखड्यानुसार बोर प्रकल्पातून ३ दरवाजे ३० सेंमीने उघडून त्यामधून ६६ क्युसेक पाणी बोरनदीपात्रात सोडण्यात आले. पातळीत वाढ झाल्याने कितीही वेळा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकते, असे उपविभागीय अभियंता भालेराव यांनी म्हटले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर