शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

कोसळधारेने वर्धामाई वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

देऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देआर्वी-अमरावती मार्ग बंद । अप्पर वर्धाच्या ३३ दारांतून पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोसळधारेमुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील देऊरवाडा-कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. याकरिता आर्वी-अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आर्वी परिसरात मागील ३६ तासांपासून संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूस निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात संचयित झालेले पाणी वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून ३३ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहेदेऊरवाडा-कौंडण्यपूर येथे मोठया प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. संततधार अशीच कायम राहिल्यास आणखी काही दिवस वाहतूक ठप्प राहणार असल्याचे सांगितले जात आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारानिम्न वर्धा धरणाची पूर्ण दारे उघडण्यात आली असून या ३१ दारातून १.३ मीटर एकूण सिसर्ग घन मीटर प्रतिसेकंद ३ हजार ४६६ क्युसेक्स पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी निम्न वर्धा धरणाच्या ३१ दारांतून ३० सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्धा नदी काठावरील धनोडी बहाद्दरपूर, वडगाव (पांडे), दिघी (होणाडे) सायखेडा, देऊरवाडा आदी एकूण २३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे धनोडी यांनी दिली.बोरचे तीन दरवाजे ३० सेंमीने उघडलेसेलू -सध्या बोरधरण ९०.८१ टक्के भरले आहे. धरणातून शनिवारी दुपारी ४ वाजता ३ दरवाजे ३० सेंमी उघडून ६६ क्युसेक्स पाणी बोर नदीपात्रात सोडण्यात आले. नदीकाठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. बोरधरणाचा एकूण जलसाठा १२३.२१२ दलघमी आहे. शनिवारी पाणी पातळी ३१९.५२ मीटर व साठा १११.८८३५ दलघमी असा साठा ९०.८१ टक्के आहे. धरणाचे परिचलन आराखड्यानुसार बोर प्रकल्पातून ३ दरवाजे ३० सेंमीने उघडून त्यामधून ६६ क्युसेक पाणी बोरनदीपात्रात सोडण्यात आले. पातळीत वाढ झाल्याने कितीही वेळा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकते, असे उपविभागीय अभियंता भालेराव यांनी म्हटले असून सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीfloodपूर