शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

वर्धा नदीपात्राला कोरड; डोहानेही गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 22:26 IST

वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना अडचणीत : पालिकेच्यावतीने नदी खोलीकरणाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे. त्यामुळे देवळी शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.देवळी शहराला अंदोरी येथील वर्धानदीवरुन पाणीपुरवठा केल्या जातो. पण, नदी कोरडी झाल्याने शहरातील पाणी समस्या लक्षात घेताच नगरपालिकेने नदीपात्रातील डोहाचे खोलीकरण सुरु केले आहे. देवळीकरांच्या घशाला कोरड पडण्यापूर्वीच पाण्याची सोय करण्याकरिता जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने कामाला गती दिली आहे. डोह असलेल्या भागात खोलीकरण करून यातील पाणी एका नालीव्दारे पालिकेच्या जलकुंभापर्यंत पोहोचविले जात आहे. एप्रिलमहिन्यातच ही भयावह स्थिती असल्याने मे महिन्यात याही पेक्षा पाण्याची भिषणता जानवणार आहेत. त्यामुळे वेळीच धोका ओळखून पालिकेने खोलीकरणाकरिता धडपड चालविली आहे. नगरपालिकेचे उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रा. नरेंद्र मदनकर यांच्या देखरेखीत गेल्या दोन दिवसांपासून खोलीकरण केले जात आहे. मागील काही वर्षाचे तुलनेत यावर्षी देवळी तालुक्यातील गावात पाणी टंचाईची भिषणता मोठ्या प्रमाणात आवासून उभी ठाकली आहे. विहिरीही अखेरच्या घटका मोजत असल्याने गावातील नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.पात्रातील जलकुंभ पडला उघडाशहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्चुन नविन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अंदोरीच्या वर्धा नदीपात्रात असेलेल्या डोहाचे पाणी पालिकेच्या जलकुंभात साठवून शहराला पाणीपुरवठा केल्या जात आहे. पण पाण्याचे वाढते बाष्पीभवन आणि निम्न वर्धा जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे या नदीपात्रातील पाण्याची धार बंद झाली आहे. सध्या नदीपात्रात मातीचा व वाळूचा गाळ साचलेला दिसून येतो. वाहते पाणी नसल्याने नदीतील डोह उघडा पडून आटण्याची शक्यता बळावली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे जलकुंभ याआधी नदी पात्राच्या पाण्यात बुडलेला राहायचा. मात्र सद्यस्थितीत हा जलकुंभ घडला पडला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई