शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

वर्ध्यात बापूंनी नाकारलेल्या अतिरेकी विकासालाच मिळतेय चालना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 11:55 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे.

ठळक मुद्देगांधीवादी, पर्यावरणपे्रमींमध्ये रोष सेवाग्राम आराखड्यातील कामात शेकडो वृक्षांचा बळी

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अतिरेकी विकासाला नाकारून वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र, त्यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. त्यामुळे बापूंना नको असलेला निसर्ग ‘भकास’ करणारा ‘विकास’ चक्क गांधीभूमीतच होत असल्याने गांधीविचारक व पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांना गती दिली जात आहे. या आराखड्यांतर्गत दत्तपूर-वर्धा-सेवाग्राम या मार्गाचे चौपदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाकरिता आतापर्यंत ७० वृक्ष तोडण्यात आले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. वर्धा ते सेवाग्राम या मार्गालगत लावलेले बहुतांश वृक्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या काळातील आहेत. जवळपास ७५ ते ८० वर्षांपासून वर्धेकरांना शुद्ध हवा आणि सावली देणाऱ्या या वृक्षांचे आता विकासाच्या झंझावातात सरपण होत आहे. वृक्षांची होणारी ही कत्तल गांधीविचार, पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांना असहनीय असल्याने त्यांनी याला विरोध दर्शवून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वृक्षांच्या संवर्धनासाठी गांधीभूमीतील आंदोलनाची धग आता समाजमाध्यमांद्वारे देशपातळीवरही पोहोचली आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत दत्तपूर ते सेवाग्राम या जवळपास १२ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गांतर्गत ३ हजार वृक्ष येतात पण, ते रस्त्यामध्ये येऊन अपघातास कारण ठरण्याची शक्यता आहे, असे १७० वृक्ष तोडावे लागणार आहेत. आता पर्यावरणप्रेमींच्या भावनांचा विचार करून फेरसर्वेक्षण सुरू केले आहे. यापैकी किती वृक्ष वाचविता येतील, याची माहिती घेतली जात आहे. सोबतच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत जास्त वृक्ष लावले जाणार आहेत.

- गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

ज्या महात्मा गांधींनी वृक्षांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करून साजरा करण्यात येत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो वृक्षतोड करून, पर्यावरणाला हानी पोहोचविणारा नसावा. याबाबत तात्काळ काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा चिपको आंदोलन केले जाईल.- संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशन,वर्धा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम