शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

डेंग्यूच्या अप्रत्यक्ष रक्त संकलनात वर्धा माघारला

By admin | Updated: August 1, 2016 15:54 IST

आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यूच्या रुग्णाचा शोध घेण्याकरिता आवश्यक असलेल्या दोन संकलन पद्धतीपैकी अप्रत्यक्षरित्या रक्त संकलनात जिल्हा माघारला आहे

रूपेश खैरी / ऑनलाइन लोकमत - 
चार महिन्यांत केवळ २५ रक्तनमुने तपासणीकरिता 
वर्धेलगतच्या दयाल नगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण 
प्रत्यक्ष रक्त संकलास जिल्ह्यात नव्याने प्रारंभ 
वर्धा, दि. 01 -  प्रत्यक्ष ठराविक औषधोपचार नसलेल्या डेंग्यूवर केवळ जनजागृती हाच एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. असे असताना याच विभागाकडून डेंग्यूच्या रुग्णाचा शोध घेण्याकरिता आवश्यक असलेल्या दोन संकलन पद्धतीपैकी अप्रत्यक्षरित्या रक्त संकलनात जिल्हा माघारला आहे. या प्रकारातून होत असलेले रक्तसंकलन सरासरी कमी होत आहे. 
 
डेंग्यूवर आळा बसविण्याकरिता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक महिन्याला बाह्य रुग्ण विभागातील तापाच्या रुग्णसंख्येच्या १५ टक्के रक्तनमुन्यांचे संकलन होणे आवश्यक आहे. सध्याच्या वातावरणात व्हायरल फिव्हरचा जोर असताना जिल्ह्यातून गत चार महिन्यात केवळ २५ रक्तनमुनेच पाठविण्यात आले आहे. यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.  हा रुग्ण शहरी भागातील असल्याचे समोर आले आहे. याबाबीला वर्धा शहरातील अस्वच्छता कारणीभूत असल्याचे बोलले जाते आहे. 
 
वाढत्या डेंग्यूच्या आजारावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावीने दोन पद्धतीने रक्तसंकलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या पद्धती अंमलात आहेत. त्यापैकी आरोग्य सेवकांच्यावतीने प्रत्यक्ष संकलन पद्धतीचा वापर होत असून रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांच्या रक्तनमुन्यांकडे मात्र कर्मचाºयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोग्य विभागाच्यावीतने सांगण्यात आले आहे. 
 
शालेय जनजागृतीला प्रारंभ
डेंग्यूच्या आजारावर आळा मिळविण्याकरिता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून सोमवारपासून शालेय डेग्यू जनजागृती अभियानाला प्रारंभ झाला आहे. १५ दिवस चालणाºया या अभियानातून विद्यार्थ्यांत या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यात येणार असल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात आले आहे. 
 
डेंग्यू आता नोटीफाईड आजार
डेंग्यूची नोंद अधिसूचित आजारांच्या यादीत केली आहे. यापुढे सरकारी रुग्णालयासह खासगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने तसे आदेशही जारी केला आहे. सन २०१२ मध्ये जिल्ह्यासह सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली होती. आतापर्यंत या आजाराबाबत ३६ हजारांपर्यंत नोंद आरोग्य विभागाकडे आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णाचा नोटीफाईड यादीत समावेश करण्याची मागणी पुढे आली होती. मुंबई येथील हेल्प फाऊंडेशनतर्फे यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.  
 
राज्यात तातडीने डेंग्यू रुग्णांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले होते. सरकारी आरोग्य यंत्रणेने डेंग्यूच्या नोंदी घेतल्या होत्या; मात्र खासगी रुग्णालयावर यासंदर्भात कोणतीही बंधने नव्हती. परंतु केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने डेंग्यूच्या अधिसूचना दिल्या गेल्या आहे. त्यामुळे सार्वजनिक, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार करणाºया डॉक्टरांनी डेंग्यू रुग्णाची नोंद घ्यावी लागणार आहे. रुग्णांची आकडेवारी महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाकडे तर ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाºयाकडे डेंग्यू रुग्णाची नोंद करावी लागेल.
 
तीन वर्षांत १८ जणांचा मृत्यू  
ठराविक औषधोपचार नसलेल्या या आजाराने जिल्ह्यात गत तीन वर्षांत एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सन २०१३ मध्ये वर्धेत १३५ रुग्ण आढळले होते. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. सन २०१४ मध्ये ३४६ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. सन २०१५ मध्ये ४१ रुग्णांची नोंद झाली असून यापैकी एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
आरोग्य विभागाच्यावतीने दोन्ही प्रकारातील संकलन सुरू आहे. मात्र अप्रत्यक्ष रक्त संकलनात जिल्हा माघारात असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आल्या आहेत. तो वाढविण्यावर आरोग्य विभागाचा कल आहे.
- डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा