शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:09 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे.

ठळक मुद्देसर्वच विधानसभा मतदार संघात राहिला भाजपचा बोलबालातडस यांच्या व्यक्तिगत जनसंपर्काला मतदारांची पसंतीगटबाजी व गुडगावचा उमेदवार हेच कॉँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्क ।

वर्धा : २

०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. पाच वर्षांनंतरही या लोकसभा मतदारसंघात मोदी लाट कायम राहिल्याचे चित्र या निकालाने स्पष्ट झाले आहे. मागील पाच वर्षांत रामदास तडस यांनी मतदारांशी व्यक्तिगतस्तरावर ठेवलेला जनसंपर्क, भारतीय जनता पक्षपातळीवरील संघटनेची बांधणी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, तेवढीच शिवसेनेने ऐनवेळी समर्थपणे दिलेली साथ हेच भाजपच्या विजयाचे मुख्य कारण ठरले.वर्धा : स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपा उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस आघाडी घेऊन होते. पहिल्या फेरीत ७ हजार ८९६ मतांची आघाडी मिळाली.मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सहाही विधानसभा क्षेत्राची मतमोजणी करण्यात येत होती. याच मतमोजणीसोबत पोस्टल बॅलेटचीही मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्यावर तडस यांनी आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत तडस यांना २३ हजार १५ मते मिळाली. तर चारूलता टोकस यांना १५ हजार १९९ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. धनराज वंजारी यांना १ हजार १७६ तर बसपाचे शैलेश अग्रवाल यांना १ हजार ११६ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही तडस यांना ४३ हजार ५४८ तर टोकस यांना ३२ हजार ८०२ मते मिळाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीतच तडस काँग्रेस उमेदवार टोकस यांच्यावर आघाडी घेत राहिले. त्यामुळे तडस यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मतमोजणीच्या स्थळावर १४ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीच्या २७ फेºया करण्यात आल्या. काही टेबलवर अतिशय वेगाने काम आटोपण्यात येत होते. त्यामुळे तेथील मतमोजणीचे आकडे लगेच बाहेर पडत होते. मतमोजणीच्या १० फेºया आटोपल्यानंतर भाजप उमेदवार रामदास तडस दुपारी ४.२५ मिनिटांनी मतमोजणीस्थळी पोहोचले. येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. धनराज वंजारी हेसुद्धा मतमोजणीस्थळी उपस्थित होते. भाजपाला वर्धा लोकसभा मतदार संघात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर शहरातील शिवाजी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार विराजमान होणार, असे दिसताच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.या निकालाचा ऐतिहासिक संदर्भवर्धा लोकसभा मतदारसंघात १९५१ पासून सलग निवडणुका जिंकणाऱ्यांमध्ये कमलनयन बजाज, वसंत साठे यांचा समावेश आहे. आता २०१९ मध्ये सलग दुसºयांदा विजय मिळविणारे रामदास तडस यांचे नाव जोडल्या गेले आहे. कमलनयन बजाज यांनी १९५७, १९६२ व १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांनी १९८०, १९८४ व १९८९ मध्ये सलग निवडणुका जिंकल्या.त्यानंतर २०१४ मध्ये रामदास चंद्रभान तडस हे भाजपकडून निवडून आले व आता पुन्हा २०१९ मध्ये मतदारांनी त्यांना संधी दिली आहे. तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर दत्ता मेघेही दोनदा निवडून आले आहेत. मेघे यांनी १९९८ मध्ये पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर २००९ मध्ये दत्ता मेघे पुन्हा निवडून आले. मात्र, या मतदारसंघातून सलग निवडणूक जिंकणारे तडस हे तिसरे खासदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालwardha-pcवर्धा