शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:09 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे.

ठळक मुद्देसर्वच विधानसभा मतदार संघात राहिला भाजपचा बोलबालातडस यांच्या व्यक्तिगत जनसंपर्काला मतदारांची पसंतीगटबाजी व गुडगावचा उमेदवार हेच कॉँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्क ।

वर्धा : २

०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. पाच वर्षांनंतरही या लोकसभा मतदारसंघात मोदी लाट कायम राहिल्याचे चित्र या निकालाने स्पष्ट झाले आहे. मागील पाच वर्षांत रामदास तडस यांनी मतदारांशी व्यक्तिगतस्तरावर ठेवलेला जनसंपर्क, भारतीय जनता पक्षपातळीवरील संघटनेची बांधणी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, तेवढीच शिवसेनेने ऐनवेळी समर्थपणे दिलेली साथ हेच भाजपच्या विजयाचे मुख्य कारण ठरले.वर्धा : स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपा उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस आघाडी घेऊन होते. पहिल्या फेरीत ७ हजार ८९६ मतांची आघाडी मिळाली.मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सहाही विधानसभा क्षेत्राची मतमोजणी करण्यात येत होती. याच मतमोजणीसोबत पोस्टल बॅलेटचीही मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्यावर तडस यांनी आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत तडस यांना २३ हजार १५ मते मिळाली. तर चारूलता टोकस यांना १५ हजार १९९ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. धनराज वंजारी यांना १ हजार १७६ तर बसपाचे शैलेश अग्रवाल यांना १ हजार ११६ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही तडस यांना ४३ हजार ५४८ तर टोकस यांना ३२ हजार ८०२ मते मिळाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीतच तडस काँग्रेस उमेदवार टोकस यांच्यावर आघाडी घेत राहिले. त्यामुळे तडस यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मतमोजणीच्या स्थळावर १४ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीच्या २७ फेºया करण्यात आल्या. काही टेबलवर अतिशय वेगाने काम आटोपण्यात येत होते. त्यामुळे तेथील मतमोजणीचे आकडे लगेच बाहेर पडत होते. मतमोजणीच्या १० फेºया आटोपल्यानंतर भाजप उमेदवार रामदास तडस दुपारी ४.२५ मिनिटांनी मतमोजणीस्थळी पोहोचले. येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. धनराज वंजारी हेसुद्धा मतमोजणीस्थळी उपस्थित होते. भाजपाला वर्धा लोकसभा मतदार संघात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर शहरातील शिवाजी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार विराजमान होणार, असे दिसताच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.या निकालाचा ऐतिहासिक संदर्भवर्धा लोकसभा मतदारसंघात १९५१ पासून सलग निवडणुका जिंकणाऱ्यांमध्ये कमलनयन बजाज, वसंत साठे यांचा समावेश आहे. आता २०१९ मध्ये सलग दुसºयांदा विजय मिळविणारे रामदास तडस यांचे नाव जोडल्या गेले आहे. कमलनयन बजाज यांनी १९५७, १९६२ व १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांनी १९८०, १९८४ व १९८९ मध्ये सलग निवडणुका जिंकल्या.त्यानंतर २०१४ मध्ये रामदास चंद्रभान तडस हे भाजपकडून निवडून आले व आता पुन्हा २०१९ मध्ये मतदारांनी त्यांना संधी दिली आहे. तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर दत्ता मेघेही दोनदा निवडून आले आहेत. मेघे यांनी १९९८ मध्ये पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर २००९ मध्ये दत्ता मेघे पुन्हा निवडून आले. मात्र, या मतदारसंघातून सलग निवडणूक जिंकणारे तडस हे तिसरे खासदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालwardha-pcवर्धा