शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Wardha Gram Panchayat Result : आर्वी तालुक्यात काँग्रेसची मुसंडी; चार ग्रामपंचायतींवर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 17:03 IST

विजयी उमेदवारांनी गुलाल उधडून साजरा केला आनंदोत्सव

आर्वी (वर्धा) : तालुक्यात सात ग्रामपंचायतसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार दादाराव केचे व काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या गटांत चुरशीचीच लढत झाली. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून, सात पैकी चार ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला. तर एका ग्रामपंचायतीत कुणाची सत्ता आली याबाबत संभ्रम कायम होता.

आर्वी तालुक्यात झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चार काँग्रेस गटाचे सरपंच निवडणूक आले, तर तीन भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, यात अहिरवडा ग्रामपंचायतमध्ये सात अनपोज उमेदवार होते. पण आता सरपंच पदाचा उमेदवार भाजपचा की काँग्रेसचा, यावर घमासान सुरू झाले आहे. या ठिकाणी भाजपचे दोन गट पडले होते. यातील एका गटाने काँग्रेस गटाकडे साकडे घातले होते. त्यामुळे दोन गटांतील एक उमेदवार सरपंच पदाचा निवडून आला. आता नेमका तो सरपंच कोणाकडे जाणार हे येणारा काळच सांगणार आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

मांडलात काँग्रेसची सत्ता

मांडला ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थित गटाचे सर्व सदस्य विजयी झालेत. विजयी सरपंच म्हणून सुरेंद्र धुर्वे यांच्या गळ्यात माळ पडली. तर मिर्झापूर नेरी ग्रामपंचायत पुन्हा पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेली. तेथे सरपंच म्हणून बाळा सोनटक्के हे विजयी झालेत.

हैबतपूर येथे भाजपला मिळाली केवळ एक जागा

हैबतपुर येथे सहा जागेवर काँग्रेस, तर एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. सरपंचपदी काँग्रेसचे सचिन पाटील हे निवडून आले. तर सर्कसपूर येथे पाच काँग्रेस, तर दोन जागा भाजपला मिळाल्या. तेथे गजानन हनवते हे सरपंच म्हणून निवडून आले. पिंपरी भुतडा ( पु.) ग्रामपंचायतीत चार जागा काँग्रेस, तर तीन जागा भाजपला मिळाल्या. तेथे सरपंच म्हणून रज्जाक अली हे विजयी झाले.

जाम ग्रामपंचायतीत भाजपला मिळाल्या तीन जागा

जाम पुनर्वसन येथे काँग्रेस समर्थित गटाला चार, तर भाजप समर्थित गटाला तीन जागांवर विजय मिळाला. येथे सरपंच म्हणून राजकुमार मनोहरे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. सर्कसपूरची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, या ठिकाणी काँग्रेसने विजय मिळविला.

तीन टेबलवर झाली मतमोजणी

मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी काम पाहिले. तीन टेबलांवरून सोमवारी मतमोजणी पूर्ण झाली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwardha-acवर्धा