शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील वर्धिनींचे सव्वाचार कोटींचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:15 IST

एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्दे१ हजार ८६ महिलांची उपासमारउमेद अभियानांतर्गत महिलांच्या उत्थानासाठी कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ८६ वर्धिनींचे तब्बल ४ कोटी २१ लाख ६१ हजार ६२१ रुपयांचे शासनाकडे थकले आहेत. महिलांच्या उत्थानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वर्धिनींना मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिलांच्या विकास व उत्थानासाठी विविध उपक्रम राबविले जातात. उमेद अभियानाअंतर्गत वर्धिनीमार्फत गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. यामध्ये घटस्फोटित, विधवा व परितक्त्यांचादेखील समावेश आहे.वर्धिनींना या कामाचा मोबदला म्हणून ठराविक मानधन दिले जाते. जिल्ह्यामध्ये २०११-१२ पासून या वर्धिनी आपले कर्तव्य बजावत आहेत. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत जिल्ह्यातील १ हजार ८६ वर्धिनींना मानधन मिळाले नाही.त्याच्या मानधनापोटी ४ कोटी २१ लाख ६१ हजार ६२१ रुपये शासनाकडे थकीत असल्याने आता मानधनाविना उदनिर्वाह कसा करावा, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

वर्धिनींनी आमदारांना घातले साकडेस्थानिक अधिकाऱ्यांकडून तोडगा निघत नसल्याने वर्धिनींनी आमदार डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. आमदार भोयर यांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांना पत्र पाठविले. तसेच याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजीत बढे, उमेदच्या जिल्हा समन्वयक स्वाती वानखेडे यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती सरस्वती मडावी, वैशाली नोहाटे, मनीषा आसरकर, माधुरी निधेकर, रूपाली अंबुलकर, वंदना थूल, अर्चना ताकसांडे, वनिता वैद्य, पूजा भगत, वनिता पाटील, राजू मडावी, आशिष कुचेवार उपस्थित होते.

राज्यातील २२ जिल्ह्यात बजावले कर्तव्यजिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ वर्धिनींनी २०११-२०१२ पासून राज्यातील नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, औरंगाबाद, अहमदनगरसह २२ जिल्ह्यांत सामाजिक समावेशन संस्था बांधणी व क्षमता बांधणीचे काम केले आहे.यामध्ये कनिष्ठ वर्धिनींच्या १२० चमूमध्ये ७८६ तर वरिष्ठ वर्धिनींच्या १०० चमूमध्ये ३०० महिलांचा समावेश होता. चार महिन्यांचे मानधन शासनाकडे थकीत असल्याने संबंधित विभागाकडे सतत पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या थकीत मानधनाबाबत कोणताच निर्णय झाला नाही.शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने मानधन रखडले आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांकडून मौखिकरीत्या सांगितले जात आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे.

टॅग्स :Governmentसरकार