शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वर्धा जिल्ह्यात शेंग भरत असतानाच तुरीवर अळीचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:57 IST

Agriculture Wardha News सोयाबीन आणि कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा फटकाशेतकऱ्यांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सोयाबीन आणि कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेत शिवारात येत हवालदील शेतकऱ्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.

तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता चिकणी भागातील वृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उभे पीक उपटून टाकावे काय असा विचार सध्या या भागातील शेतकरी करीत आहेत. सप्टेंबर आणि अक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे तसेच बोगस बियाण्यांमुळे या भागातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा यंदाच्या वर्षी चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातून कसे बसे सावरत नाही तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. या संकटातून सावरण्यापूर्वीच आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीने अटॅक केला आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येत त्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.उत्पादनात घट येण्याची शक्यतापरिसरातील काही शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. तर काही शेतकरी तुरीची सलग लागवड करतात. यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी समाधानकारक उत्पन्न होईल या आशेवर तूर पिकाची लागवड केली. पण अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा सोयाबीनची सवनगणी कराचे कामच पडले नाही. उभ्या पिकात जनावरे चराईसाठी सोडावी लागली. तर गुलाबी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात बऱ्यापैकी घट आली आहे. या दोन्ही संकटातून बाहेर निघण्यापूर्वीच आता तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुणी बांधावर पोहोचलेले नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य सल्ला द्यावा.- मोरेश्वर घोडे, शेतकरी, चिकणी.

 

टॅग्स :agricultureशेती