शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वर्धा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यू दर पोहोचला ६.०६ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 07:00 IST

वर्धा जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआठ व्यक्तींचा घेतला बळीकासवगतीने जिल्ह्यातील नागरिकांना नेतोय मृत्यूच्या दारात

महेश सायखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : काळी बुरशी अशी ओळख असलेल्या म्युकरमायकोसिस हा आजार जिल्ह्यातील नागरिकांना कासवगीनेच आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दारापर्यंत नेत आहे. या आजाराने आतापर्यंत तब्बल आठ व्यक्तीचा बळी घेतला असून जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने बळी घेतला असून ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. तर सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन रुग्णांनी स्वत:च रुग्णालयातून सुटी घेतली आहे.

बाधितांत पुरुष सर्वाधिक

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यात १०६ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

रिकव्हरी दर ९०.१५ टक्के

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने आठ व्यक्तींचा बळी घेतला असला तरी आतापर्यंत ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा रिकव्हरी दर ९०.१५ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा म्युकरमुळे मृत्यू झाला असून ११९ रुग्णांनी या आजारावर विजय मिळविला आहे. वेळीच उपचार म्युकरमुक्तीसाठी महत्त्वाचे असून कुठल्याही व्यक्तीला लक्षणे असल्यास त्याने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिस