शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यू दर पोहोचला ६.०६ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 07:00 IST

वर्धा जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआठ व्यक्तींचा घेतला बळीकासवगतीने जिल्ह्यातील नागरिकांना नेतोय मृत्यूच्या दारात

महेश सायखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : काळी बुरशी अशी ओळख असलेल्या म्युकरमायकोसिस हा आजार जिल्ह्यातील नागरिकांना कासवगीनेच आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दारापर्यंत नेत आहे. या आजाराने आतापर्यंत तब्बल आठ व्यक्तीचा बळी घेतला असून जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने बळी घेतला असून ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. तर सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन रुग्णांनी स्वत:च रुग्णालयातून सुटी घेतली आहे.

बाधितांत पुरुष सर्वाधिक

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यात १०६ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

रिकव्हरी दर ९०.१५ टक्के

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने आठ व्यक्तींचा बळी घेतला असला तरी आतापर्यंत ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा रिकव्हरी दर ९०.१५ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा म्युकरमुळे मृत्यू झाला असून ११९ रुग्णांनी या आजारावर विजय मिळविला आहे. वेळीच उपचार म्युकरमुक्तीसाठी महत्त्वाचे असून कुठल्याही व्यक्तीला लक्षणे असल्यास त्याने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिस