शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Corona Virus in Wardha; बालाघाटला निघालेल्या ३४ कामगारांना वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 19:20 IST

आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा:- आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले. तसेच उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.उमरी मेघे येथील हर्षनील अ‍ॅग्रो इंडस्ट्री आहे. येथे ३४ कामगार काम करतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना घरी जायचे होते. हे कामगार भर उन्हात आज बालाघाटकडे पायी प्रवासाला निघाले होते. जिल्हाधिकारी आर्वीचा दौरा आटोपून परत येत असताना त्यांना उमरी मेघे येथे हे मजूर भरदुपारी पायी जाताना दिसले. त्यांनी लगेच गाडी थांबवून मजुरांची विचारपूस केली. 300 किलोमीटरचा पायी प्रवास करणे अवघड आहे. देशात लॉक डाऊन असल्यामुळे खाण्या पिण्याचे आणि राहण्याची सोय रस्त्यात कुठेही होणार नाही. रस्त्यात तुम्ही आजारी पडलात तर दवाखाने कुठे शोधणार. आम्ही तुमची पूर्ण व्यवस्था करू. हे सर्व संपले की तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. तुम्ही संगीत वाजवा, गाणे म्हणा, खेळा तुम्हाला हवं ते करा आम्ही तुमची सर्व व्यवस्था करतो असे समजावून सांगितल्यावर मजूर थांबायला तयार झाले.वर्धा तहसीलदार प्रीती डुडुलकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन मालकाशी चर्चा केली. ते पगार द्यायला तयार असूनही कामगारांना त्यांच्या गावी जायचे होते. अशा परिस्थितीत एवढा प्रवास करून जाणे धोकादायक असल्याचे त्यांना समजावून सांगितले आणि तिथेच थांबविण्यात आले. उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच प्रशासनाने त्यांना शिधासुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस