शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

प्रभावी उपाययोजनांमुळेच वर्धा ‘कोरोनामुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लक्षणे असणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात आल्या.

ठळक मुद्देसाथरोग नियंत्रण कक्ष, विशेष पथक, चेकपोस्ट, नियमित सर्वेक्षण, आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच वर्धा कायम शून्य राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रण कक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी आणि गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लक्षणे असणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात आल्या. याचे नागरिकांनी पालन केले. चोरमार्गाने येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हीच कोरोनाला रोखण्यात जमेची बाजू ठरली. सर्व विभागांचे सांघिक प्रयत्न व सहकार्याने वर्धा जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.२४ तास नियंत्रण कक्ष, माहिती अद्ययावत करण्याचे कामजिल्हास्तरावर २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापन करून जिल्हाधिकारी, व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा खोब्रागडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदीप नखाते, जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. विनीत झलके, डॉ. अनुजा बारापात्रे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ तेलतुंबडे, आरोग्य सहाय्यक जवाहर सेलोकर, मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी, नारायण जवादे, डीईओ (आयडीएसपी) यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.या कक्षामार्फत जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरून देशातून आलेले तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांशी तत्काळ संपर्क साधून लक्षणे आहेत का, याची माहिती घेऊन सर्व माहिती अद्ययावत करण्याचे कार्य नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांची तपासणी करण्यास्तव जिल्ह्यातील प्रत्येक चेकपोस्टवर व प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता थर्मल स्कॅनिंग गन पुरविण्यात आल्या. त्यामार्फत चेकपोस्टवर येणाºया नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दररोज रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच हॅपी हायपोक्सीयाची प्राथमिक लक्षणे शोधून काढण्यास्तव प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये पल्स ऑक्झीमीटरद्वारेसुद्धा तपासणी करण्यात येत आहे.सीमेवरील चेकपोस्टवर तपासणीजिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या असून सर्व सीमाभागात एकूण १६ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांची नोंद घेण्यात आली व अशा लोकांना गृहविलगीकरण करण्यात आले. प्रत्येकाची नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यात आली.मजुरांची तपासणीकामाकरिता वर्धा जिल्ह्यात आलेल्या मजुरांची नोंदणी करून त्यांची समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आर.बी.एस.के व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत नियमित तपासणी करण्यात आली. विविध ५९ निवाºयांमध्ये असलेल्या आजपर्यंत जवळपास ८४१२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.खाकीतील कोरोना योद्यांची आरोग्य तपासणीजिल्ह्यातील एकूण १६ चेकपोस्ट वर कार्यरत तसेच संपूर्ण जिल्ह्यामधील कार्यरत पोलीस विभागातील एकूण २२०० कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय अधिकारी तसेच आयएमएचे डॉक्टरांमार्फत करण्यात आली व समुपदेशन तसेच किरकोळ आजारांवर उपचार करण्यात येत आहे.गावपातळीवर सर्वेक्षणआरोग्य विभागामार्फत प्रत्येक शहर व गांव पातळीवर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत दैनंदिन प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एसएआरआय व आयएलआय या सारखी लक्षणे आढळलेल्या रुग्णांची दैनंदिन माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परदेशातून आलेल्या ११४ तसेच परजिल्ह्यातून १९९१० नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करून लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण ११५३ एवढी पथके तयार करण्यात आलेली असून त्यांची जबाबदारी तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र यांना सोपविण्यात आलेली आहे.सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे व नियोजन केल्यामुळे कोरोनाचा सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे. मात्र, नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, घाबरून जाऊ नये, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे व शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यापुढे सुद्धा टाळता येईल. प्रतिबंध हाच उपचार असून सर्व नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या