शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

वर्धा मध्यवर्ती सहकारी बॅक पुनरुज्जीवनाचा शासनाला विसर

By admin | Updated: January 23, 2016 02:17 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांच्याशी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनर्जीवनासाठीची चर्चा झाली.

किसान अधिकार अभियानने पाठविले राज्यमंत्र्यांना स्मरणपत्रवर्धा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांच्याशी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनर्जीवनासाठीची चर्चा झाली. यावेळी महिनाभरात हा प्रश्न सुटेल असे आश्वासन देण्यात आले होते. पण महिना लोटूनही अद्याप कोणतेही पाऊल यासंदर्भात पुढे पडले नाही. त्यामुळे या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी किसान अधिकार अभियानद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यामार्फत राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांना स्मरणपत्र सादर केले.वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेला रिझर्व बँकेचा परवाना प्राप्त करण्यासाठी व बँकेची तरलता व्यवस्थित करण्यासाठीची आवश्यक रक्कम राज्य शासनाने वर्षभरापूर्वीच देवू केली आहे. यासंबंधात बँकेला शासनाकडून ११० कोटी रूपयांचा पहिला हप्ता दिल्यानंतर उर्वरित ५०.३८ कोटी रूपये देण्यासंबंधात २७ आॅक्टोबर २०१५ ला राज्य शासनाच्या मंत्रमंडळाचा निर्णय झाल्याची माहिती आहे. परंतु दीड महिना लोटूनही वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्वरित मदतनिधी प्राप्त झाला नाही. यासंबंधात नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी भेट घेवून चर्चा केली. या अधिवेशनात सहकार सचिव जाधव यांच्याशीही चर्चा झाली. यावेळी त्यांनी महिनभरात उर्वरित मदत निधीची ५०.३८ कोटी रूपये रक्कम बँकेला मिळेल, असे आश्वासन दिले होते. महिना लोटूनही शासनाने ही रक्कम वर्धा बँकेला दिलेली नाही. त्यामुळे यासंबंधात राज्यशासनाला स्मरण करून देण्यासाठी किसान अधिकार अभियानद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)