शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
5
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
6
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
7
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
8
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
9
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
10
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
11
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
12
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
13
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
14
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
15
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
16
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
17
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
18
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
19
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
20
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!

वर्धा मध्यवर्ती सहकारी बॅक पुनरुज्जीवनाचा शासनाला विसर

By admin | Updated: January 23, 2016 02:17 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांच्याशी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनर्जीवनासाठीची चर्चा झाली.

किसान अधिकार अभियानने पाठविले राज्यमंत्र्यांना स्मरणपत्रवर्धा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांच्याशी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनर्जीवनासाठीची चर्चा झाली. यावेळी महिनाभरात हा प्रश्न सुटेल असे आश्वासन देण्यात आले होते. पण महिना लोटूनही अद्याप कोणतेही पाऊल यासंदर्भात पुढे पडले नाही. त्यामुळे या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी किसान अधिकार अभियानद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यामार्फत राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांना स्मरणपत्र सादर केले.वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेला रिझर्व बँकेचा परवाना प्राप्त करण्यासाठी व बँकेची तरलता व्यवस्थित करण्यासाठीची आवश्यक रक्कम राज्य शासनाने वर्षभरापूर्वीच देवू केली आहे. यासंबंधात बँकेला शासनाकडून ११० कोटी रूपयांचा पहिला हप्ता दिल्यानंतर उर्वरित ५०.३८ कोटी रूपये देण्यासंबंधात २७ आॅक्टोबर २०१५ ला राज्य शासनाच्या मंत्रमंडळाचा निर्णय झाल्याची माहिती आहे. परंतु दीड महिना लोटूनही वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्वरित मदतनिधी प्राप्त झाला नाही. यासंबंधात नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी भेट घेवून चर्चा केली. या अधिवेशनात सहकार सचिव जाधव यांच्याशीही चर्चा झाली. यावेळी त्यांनी महिनभरात उर्वरित मदत निधीची ५०.३८ कोटी रूपये रक्कम बँकेला मिळेल, असे आश्वासन दिले होते. महिना लोटूनही शासनाने ही रक्कम वर्धा बँकेला दिलेली नाही. त्यामुळे यासंबंधात राज्यशासनाला स्मरण करून देण्यासाठी किसान अधिकार अभियानद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)