शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

वर्ध्यात ७ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात ८ कोरोनाबधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:10 IST

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील २२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी गुरुवारी ७ रुग्णबरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तर नव्याने ८ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यामध्ये ४ महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे यात आर्वी २,वर्धा ४ ,कारंजा तालुक्यातील २ रुग्ण आहेत. या रुग्णासहित जिल्ह्यातील रूग्णसंख्या ५९ झाली असून यापैकी २१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नालवाडी येथील ५ रुग्ण तसेच वीज वितरण विभागाचे 2 कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांना दोन दिवस संस्थात्मक विलागलीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र मोकळे होताच त्यांना घरी सोडण्यात येईल.आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका वय ३५ वर्ष आणि अटेंडंट वय ५५ वर्ष, वर्धा शहरातील इतवारा येथील ७२ वर्षीय महिला , हिंद नगर येथील 75 वर्षे पुरुष आणि केशव सिटी येथील ३७ वर्षीय पुरुष आणि महादेवपुरा येथील महिला तसेच कारंजा तालुक्यातील काकडा येथील पती- पत्नी वय अनुक्रमे ३० आणि २० या रुग्णांचा समावेश आहे.यातील दोन रुग्णांना सेवाग्राम येथे तर पाच रुग्णांना सावंगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.महादेवपुरा येथील महिलेचा काल मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यांना काल सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही त्यांना होते. त्यांच्यावर आज कोरोना मार्गदर्शक नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत. आज १३० स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 95 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आयसोलेशन मध्ये १४३ व्यक्ती आहेत.६२ हजार ५६५ व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ५५११३ व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून ७४५२ व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत. तसेच संस्थात्मक विलगिकरणात २६८ व्यक्ती आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस