शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा - परीक्षा प्रवेश पत्राकरिता ३०० विद्यार्थ्यांची तारांबळ

By admin | Updated: November 5, 2016 20:34 IST

रा. सू. बिडकर महाविद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्राकरिता शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली

ऑनलाइन लोकमत
हिंगणघाट (वर्धा), दि. 5 - महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे येथील रा. सू. बिडकर महाविद्यालयात उघड झाले. या महाविद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्राकरिता शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली. रविवारी परीक्षा असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशपत्राकरिता आंदोलन करावे लागले. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या बीएससी अभ्यासक्रमाची परीक्षा रविवारी आहे. यामुळे गत दोन दिवसांपासून प्रवेशपत्राकरिता  विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात चकरा सुरू होत्या. असे असतानाही या गंभीर बाबीकडे महाविद्यलयाने दुर्लक्ष केले. आवश्यक कागदपत्रांनी पूर्तता केल्यानंतर शनिवारी रात्री विद्यापीठाकडून ओळखपत्र पाठविण्यात आल्याने ते रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम सुरू होते. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.
हिंगणघाट येथील रा.सू. बिडकर महाविद्यालय यंदाच्या प्रवेश सत्रापासूनच चर्चेत आले आहे. हा वाद थांबतो न थाबतो तोच ऐन परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा ओळखपत्राचा मुद्दा चर्चेत आला. बीएससी अभ्यासक्रमाची परीक्षा रविवारी असताना या महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही. यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रवेशपत्राकरिता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. यामुळे त्यांच्या मनात वर्षे वाया जाण्याची भीती निर्माण झाली. महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.
महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचा रोष वाढत असताना महाविद्यालयाने कागदपत्रांची पूर्तता केल्याने रात्री उशिरा विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र देण्यात आले. यातही प्रवेशपत्राची प्रक्रीया आॅनलाईन असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच परवड होत असल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्यावतीने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्याचे काम सुरू होते.
 
महाविद्यालयाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नाही 
विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याने प्रवेशपत्राकरिता विद्यार्थ्यांना भटकावे लागल्याची माहिती आहे.
 
प्रवेश प्रक्रियेतही घोळ 
या महाविद्यालयात अतिरिक्त शुल्क घेवून प्रवेश देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून या महाविद्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. या चौकशीत महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला अटकही करण्यात आली होती.
 
महाविद्यालयाच्यावतीने परीक्षा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र देण्यात आले नाही. महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचण झाली. महाविद्यालयाच्यावतीने आज उशिरा कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याने रात्री उशिरा प्रवेशपत्र देण्यात आले आहे. 
- प्रमोद येवले, प्र कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर.
 
ऐन परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देणे हा अन्याय आहे. या संदर्भात विद्यापीठाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यावर कारवाई करून त्यांना सेवामुक्त करावे.
- मनोज रुपारेल, आम आदमी पार्टी, हिंगणघाट